Love Crime | आधी विवाहित महिलेशी संबंध, नंतर लग्न करुन खून, तरुणाने टोकाचे पाऊल का उचलले ?

तरुणाने महिलेची गळा दाबून हत्या (Woman Murder) केली असून तो फरार आहे. पोलीस (Police) त्याचा शोध घेत आहेत. मात्र या घटनेनंतर एकच खळबळ उडील आहे. मंगळवारी म्हणजेच 25 जानेवारी रोजी हे हत्याकांड घडले.

Love Crime | आधी विवाहित महिलेशी संबंध, नंतर लग्न करुन खून, तरुणाने टोकाचे पाऊल का उचलले ?
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 10:42 AM

पटणा : प्रेम या पवित्र संकल्पनेला काळं फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. बिहारमध्ये विवाहित महिलेशी प्रेमाचे नाटक (Love) करुन लग्न करुन तिची एका तरुणाने केली आहे. ही घटना पटना जिल्ह्यातील बाढ अनुमंडलमधील बुढनिचक येथील आहे. तरुणाने महिलेची गळा दाबून हत्या (Woman Murder) केली असून तो फरार आहे. पोलीस (Police) त्याचा शोध घेत आहेत. मात्र या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी म्हणजेच 25 जानेवारी रोजी हे हत्याकांड घडले.

नेमका प्रकार काय आहे ?

मिळालेल्या माहितीनुसार बुढनिचक गावात एक विवाहित महिला राहत होती. याच महिलेच्या घराशेजारी नीरज नावाचा तरुण राहतो. महिलेचा पती नाशिकमध्ये कामानिमित्त वास्तव्यास असल्यामुळे ती महिला आपल्या घरी एकटीच रहायची. याच गोष्टीचा फायदा घेत आरोपी नीरज महिलेच्या घरी सारखं जायचा. नीरज सारखा येत असल्यामुळे महिला तरुणाच्या प्रेमात पडली. त्यानंतर दोघेही एकमेकांसोबत राहण्याची शपथ घेऊ लागले.

लग्न करुन तरुण महिलेसोबत राहू लागला 

दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर त्यांच्यात शारीरिक संबंध झाले. या काळात आजूबाजूला कुरुबूर होऊ लागल्यामुळे दोघांनीही विवाह करण्याचं ठरवलं. त्यानंतर दोघांनीही एका मंदिरात विवाह केला. लग्न केल्यानंतर दोघांचाही संसार सुरु झाला. रितसर लग्न झाल्यामुळे महिला आपले सासर म्हणजेच नीरजच्या घरी जाण्यासाठी हठ्ठ धरू लागली. पण नीरज तसे करण्यास तयार नव्हता. आजतकने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.

शेवटी गळा दाबून केली हत्या 

महिलेसबोत लग्न केले असले तरी नीरजला घरापासून दूर लिव्ह इनमध्ये राहायचे होते. याबाबत मृत महिलेच्या बहिणीने सविस्तर माहिती दिलेली आहे. महिला घरी जाण्यासाठी वारंवार हट्ट धरू लागली. परिणामी संताप अनावर झाल्यामुळे आरोपी नीरजने महिलेचा गळा दाबून खून केला. या घटनेची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. महिलेचा खून केल्यानंतर आरोपी नीरज सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. दरम्यान, मृत महिलेच्या अवैध संबंधाबाबत माहिती मिळाल्यानंतर नाशिकमध्ये राहणाऱ्या पतीने या महिलेपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.

इतर बातम्या :

Nashik Crime | नाशिकमध्ये अवैध शस्त्रसाठा जप्त; पिस्तुल, काडतुसे, एअरगन, चॉपर, अग्निशस्त्रासह संशयितांना बेड्या

Palghar Accident | बीचवर अपघाताचा थरार, भरधाव कारने सहा पर्यटकांना चिरडलं, एकाचा मृत्यू 5 जणांची प्रकृती चिंताजनक

Crime | जिगोलो बनण्याची हौस पडली महागात, मोठी फसवणूक होताच तरुणाची पोलिसात धाव, नेमकं काय घडलं ?

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.