Palghar Accident | बीचवर अपघाताचा थरार, भरधाव कारने सहा पर्यटकांना चिरडलं, एकाचा मृत्यू 5 जणांची प्रकृती चिंताजनक

अंगाचा थरकाप उडवणारी आणखी एक घटना घडली आहे. पालघरमध्ये भरधाव कारने बीचवरील 6 पर्यटकांना चिरडले आहे. चिंचणी बीचवरील ही घटना असून यामध्ये सहापैकी पाज जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे.

Palghar Accident | बीचवर अपघाताचा थरार, भरधाव कारने सहा पर्यटकांना चिरडलं, एकाचा मृत्यू 5 जणांची प्रकृती चिंताजनक
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 8:47 AM

पालघर : वर्धा जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तब्बल सहा विद्यार्थ्यांचा अपघातात (Accident) मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या दुर्दैवी घटनेमळे सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातातील मृतांमध्ये आमदाराचा मुलगादेखील आहे. ही घटना ताजी असतानाच आता अंगाचा थरकाप उडवणारी आणखी एक घटना घडली आहे. पालघरमध्ये (Palghar Accident) भरधाव कारने बीचवरील 6 पर्यटकांना चिरडले आहे. चिंचणी बीचवरील ही घटना असून यामध्ये सहापैकी पाज जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. पोलिसांनी (Police) वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे.

कारचालकाने सहा पर्यटकांना चिरडले

मिळालेल्या माहितीनुसार अपघाताची ही घटना 26 जानेवारी रोजी घडली. पालघरमधील चिंचणी बीचवर बरेच पर्यटक आले होते. 26 जानेवारीनिमित्त सुट्टी असल्यामुळे पर्यटकांची संख्या बरीच होती. यावेळी एक माथेफिरू कार चालक भरधाव वेगात कार चालवत होता. त्याचे कारवरील नियंत्रण अचानकपणे सुटले. परिणामी कारने तब्बल सहा जणांना चिरडले. या घटनेत सहाही पर्यटक गंभीर जखमी झाले. घटना घडल्यानंतर बाकीच्या पर्यटकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. जखमी पर्यटकांना चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

चालकासह एकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

ही घटना घडल्यानंतर बाकीच्या नागरिकांनी कार चालकाला घेराव घालून पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी चालकासह आणखी एकाला बेड्या ठोकल्या आहेत. तर सहापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे. सध्या बाकीच्या पाच पर्यटकांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू

दरम्यान, मंगळवारी मध्यरात्री वर्धा जिल्ह्यात अतिशय थरारक आणि अंगाचा थरकाप उडवणार अपघात घडला. वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील सेलसुरा गावातील नदीच्या पुलावरुन चारचाकी खाली कोसळल्यानं वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तब्बल सहा विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये आमदार विजय रहांगडाले यांच्या मुलाचाही समावेश आहे. सहा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

इतर बातम्या :

Bhiwandi Accident : भिवंडीत झोपड्यावर ट्रक कोसळून तीन बहिणींचा मृत्यू, टेंभवली गावातील वीटभट्टीवरील घटना

कात्रज परिसरात कंटेनर-कारचा भीषण अपघात; अपघातात एक जण ठार

Jharkhand Crime : ये दोस्ती हम नही छोडेंगे… सोबतच गुणगुणायचे, आयुष्यही एकत्रच संपवलं; जगावेगळ्या मैत्रीचा असा झाला करूण अंत

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.