Weather Report | दिवसा उन्हाचा चटका, रात्रीचा गारवा कमी, पारा 35 अंशांपार, महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज काय?

मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, नाशिक, सांगली, सातारा, सोलापूर आदी भागात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत 2 अंशांनी वाढलं असल्याचं पुण्यातील हवामान विभागाने सांगितलं आहे.

Weather Report | दिवसा उन्हाचा चटका, रात्रीचा गारवा कमी, पारा 35 अंशांपार, महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज काय?
फोटो - गुगल
Reporter Ashwini Satav Doke | Edited By: महेश घोलप | Updated on: Feb 25, 2022 | 7:15 AM

पुणे – फेब्रुवारीच्या (february) शेवटच्या आठवड्यात अनेकांना आता उन्हाची झळ सोसावी लागत आहे, कारण राज्यातल्या तापमानात वाढ झाली आहे. कोरडे हवामान आणि निरभ्र आकाशामुळे स्थितीमुळे तापमानात वाढ झाली असल्याचा अहवाल पुण्यातील (pune) हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे. तसेच पुढील तीन ते चार तापमानातील वाढ अशीचं राहील अशी शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली आहे. रात्रीचं तापमान देखील वाढल्याने रात्रीची थंडी देखील गायब झाल्याचं पाहायला मिळत आहे. मध्य महाराष्ट्रासह (maharashtra) अनेक जिल्ह्यात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत 2 अंशांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर अनेक भागात तापमान 35 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याचं पाहायला मिळतंय.

अनेक जिल्ह्यात उन्हाचा चटका

फेब्रुवारी महिन्यात अनेकदा तुम्हाला उन्हाचे चटके जाणवायला सुरूवात होते. पण यावर्षी ही सुरूवात फेब्रुवारी महिन्यात झाली असल्याची पाहायला मिळत आहे. तुम्हाला सध्या उन्हाचे जाणवत असलेले चटके फक्त कोरडे हवामान आणि निरभ्र आकाश असल्यामुळे जाणवत असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. तसेच आणखी असंच तीन ते चार दिवस महाराष्ट्रात वातावरण राहणार असल्याची शक्यता पुण्यातील हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे तुम्हाला पुढचे तीन तरी उन्हाचे चटके जाणवतील. अचानक हवामानात बदल झाल्याने अनेकांना उन्हाळा सुरू झाल्याची जाणीव झाली होती. तसेच अनेकांना ही उन्हाळा सुरू झाल्याची सुरूवात आहे, असं देखील वाटलं होतं. पण ही तापमानातील अशीच पुढे चार दिवस राहणार आहे.

महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील तापमानात वाढ

मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, नाशिक, सांगली, सातारा, सोलापूर आदी भागात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत 2 अंशांनी वाढलं असल्याचं पुण्यातील हवामान विभागाने सांगितलं आहे. तर अनेक भागात तापमान 35 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. तापमानातील ही वाढ अशीच काही दिवस राहणार असून कोरडे हवामान आणि निरभ्र आकाश यामुळे तापमानात वाढ झाली आहे. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात रात्रीचा गारवा देखील कमी झाला आहे.

नवी मुंबईतील उड्डाणपुलावर धावती कार पेटली, पंढरपूरच्या ‘देवदुताने’ पाच जणांच्या कुटुंबाला कसं वाचवलं?

Russia Ukraine Crisis : पंतप्रधान मोदींचा रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांना फोन, भारतीय नागरिकांबाबत चिंता व्यक्त, दिला महत्वाचा सल्ला

आयपीएलचं बिगूल वाजलं! येत्या 26 मार्चपासून सामन्यांना सुरुवात; मुंबईत 55 मॅच

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us