AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएलचं बिगूल वाजलं! येत्या 26 मार्चपासून सामन्यांना सुरुवात; मुंबईत 55 मॅच

IPL 2022 Schedule : अखेर (IPL 2022) इंडियन प्रीमियर लीग 2022 चं बिगूल वाजलंय. (IPL 2022 Match Date & Time) यंदाच्या आयपीएल सत्राला 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यंदा सर्वाधिक 55 सामने मुंबईत खेवळवले जाणार आहेत.

आयपीएलचं बिगूल वाजलं! येत्या 26 मार्चपासून सामन्यांना सुरुवात; मुंबईत 55 मॅच
| Updated on: Feb 25, 2022 | 6:39 AM
Share

IPL 2022 Schedule : अखेर (IPL 2022) इंडियन प्रीमियर लीग 2022 चं बिगूल वाजलंय. (IPL 2022 Match Date & Time) यंदाच्या आयपीएल सत्राला 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. गुरुवारी आयपीएल गव्हर्निंग काउंसिलची (IPL Governing Council) बैठक पार पडली. या बैठकीत यंदाच्या सत्रातील आयपीएल मॅचला येत्या 26 मार्चपासून सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी जगासह भारतावर कोरोनाचे संकट होते. भारतात तर परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती. त्यामुळे आयपीएलचे सामने भारताबाहेर झाले होते. मात्र यंदा सर्व सामने भारतातच होणार असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेऊन सामने आयोजित करण्यात येणार आहेत. यंदाच्या आयपीएलचे बुहुता:श सामने हे पुणे आणि मुंबईतच खेळवले जाणार आहेत. मुंबईत 55 तर पुण्यात 15 मॅच खेळवण्यात येणार आहेत.

मुंबई आणि पुण्यात सामन्यांचे आयोजन

यंदा आयपीएलचे 55 सामने हे मुंबईत तर 15 सामने पुण्यात खेळवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. या सामन्यांपैकी 20 सामने हे मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर, 20 सामने डीवाय पाटील स्टेडियमवर तर सीसीआयमध्ये 15 सामने होणार आहेत. तर पुण्यात 15 सामने खेळवण्यात येणार असल्याची माहिती आयपीएल गव्हर्निंग काउंसीलच्या वतीने देण्यात आली आहे. आयपीएलच्या नियोजनासाठी आज पुन्हा एकदा आयपीएल गव्हर्निंग काउंसीलची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे. यंदा अहमदाबाद आणि लखनऊ असे दोन नवीन संघ पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहेत. दरम्यान यंदाच्या आयपीएल सत्रात प्रेक्षकांना मैदानात जाऊन मॅच पाहाण्याची संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्यासाठी महाराष्ट्र सरकारने ठरवून दिलेल्या कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक असणार आहे.

आयपीएलमध्ये सहभागी संघ

1. दिल्ली कॅपिटल्स 2. चेन्नई सुपर किंग्ज 3. मुंबई इंडियन्स 4. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर 5. कोलकाता नाईट रायडर्स 6. पंजाब किंग्ज 7. गुजरात टायटन्स 8. लखनऊ सुपर जायंट्स 9. सनरायझर्स हैदराबाद 10. राजस्थान रॉयल्स

संबंधित बातम्या

IND vs SL: इशान-श्रेयसचा तडाखा, पहिल्या T 20 मध्ये भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय

IND vs SL: रोहित शर्मा T 20 चा नवीन किंग, विराटसोबत मोठ-मोठ्या धुरंधरांना टाकलं मागे, रचना नवीन रेकॉर्ड

INDvsSL Ishan kishan: ‘पैसा वसूल भाईसाहब’ इशानच्या धमाकेदार फलंदाजीनंतर नेटीझन्सच्या भन्नाट Reaction

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली