AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: इशान-श्रेयसचा तडाखा, पहिल्या T 20 मध्ये भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय

वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेने सुरु झालेली भारताची विजयी मालिका श्रीलंकेविरुद्धच्या (India vs Srilanka) सीरीजमध्येही कायम आहे. आज लखनऊनमध्ये झालेल्या पहिल्या टी 20 सामन्यात भारताने श्रीलंकेवर 62 धावांनी सहज विजय मिळवला.

IND vs SL: इशान-श्रेयसचा तडाखा, पहिल्या T 20 मध्ये भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय
| Updated on: Feb 24, 2022 | 10:29 PM
Share

लखनऊ: वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेने सुरु झालेली भारताची विजयी मालिका श्रीलंकेविरुद्धच्या (India vs Srilanka) सीरीजमध्येही कायम आहे. आज लखनऊनमध्ये झालेल्या पहिल्या टी 20 सामन्यात भारताने श्रीलंकेवर 62 धावांनी सहज विजय मिळवला. भारताने दिलेल्या 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने निर्धारीत 20 षटकात सहाबाद 137 धावा केल्या. इशान किशन (89), (Ishan kishan) श्रेयस अय्यर नाबाद (57) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) (44) यांच्या दमदार फलंदाजीच्या बळावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 199 धावांचा डोंगर उभा केला. भारताच्या या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेची खूपच खराब सुरुवात झाली. पहिल्याच चेंडूवर भुवनेश्व कुमराने सलामीवीर पथुम निसांकाला शून्यावर बाद केलं. त्यानंतर भुवनेश्वर कुमारनेच दुसरा सलामीवीर कामिल मिसहाराला (13) धावांवर रोहित शर्माकरवी झेलबाद केले.

त्यानंतर श्रीलंकेकडून एकही मोठी भागीदारी होऊ शकली नाही. ठराविक अंतराने त्यांचे फलंदाज बाद होत राहिले. अपवाद फक्त चरित असालंकाचा त्याने नाबाद 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. तत्पूर्वी भारताला सलामीवीर इशान किशन आणि रोहित शर्माने जबरदस्त सुरुवात करुन दिली. भारताचा पहिला विकेट 111 धावांवर गेला. रोहित शर्माच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसला. रोहित शर्माने 32 चेंडूत 44 धावा केल्या.

इशान किशनने आज मागच्या काही सामन्यातील अपयश धुवून काढलं. त्याने 56 चेंडूत त्याने 89 धावा केल्या. यात 10 चौकार आणि तीन षटकार होते. शनाकाने त्याला झेलबाद केले. भारताच्या तेव्हा दोन बाद 155 धावा झाल्या होत्या. इशान बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतली व श्रीलंकेची गोलंदाजी फोडून काढली. त्याने 28 चेंडूत नाबाद 57 धावांची खेळी केली. यात पाच चौकार आणि दोन षटकार होते. या तिघांच्या बळावर भारताने श्रीलंकेला विजयासाठी 200 धावांचे लक्ष्य दिले होते. भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

India vs Srilanka 1 st T 20 india won this match leading in series by 1-0

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.