AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही सुद्धा घराच्या ‘या’ चुकीच्या दिशेला कचऱ्याचा डब्बा ठेवलाय? जाणून घ्या वास्तुशास्त्राचे नियम

वास्तुशास्त्रानुसार घरात कचऱ्याचा डब्बा योग्य जागी ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चुकीच्या ठिकाणी ठेवल्याने आर्थिक अडचणीसह कौटुंबिक कलह निर्माण होऊ शकतात. चला तर मग आजच्या लेखात वास्तुशास्त्राच्या नियमानुसार घरातील कचऱ्याचा डब्बा कोणत्या दिशेला ठेवणे महत्वाचे आहे.

तुम्ही सुद्धा घराच्या 'या' चुकीच्या दिशेला कचऱ्याचा डब्बा ठेवलाय? जाणून घ्या वास्तुशास्त्राचे नियम
Vastu Tips DustbinImage Credit source: Freepik
| Edited By: | Updated on: Feb 12, 2026 | 4:33 AM
Share

घरातील वस्तू योग्य ठिकाणी ठेवण्यासाठी वास्तुशास्त्राचे विशेष महत्त्व आहे. घराच्या बांधकामापासून ते घरातील देवघर, आरसे आणि बाथरूम यासारख्या गोष्टी कोणत्या शुभ दिशेने बांधावे यांचे वर्णन करते. असे मानले जाते की चुकीच्या पद्धतीने वस्तू ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो आणि घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते.

वास्तुशास्त्रात घरातील कचऱ्याच्या डब्यांबाबतचे नियम देखील दिले आहेत, ज्याकडे दुर्लक्ष केल्यास आर्थिक अडचणी आणि वास्तुदोष येऊ शकतात. या लेखात कचऱ्याच्या डब्बा घरात कोणत्या ठिकाणी ठेवायचा याची योग्य दिशा आणि त्यांच्याशी संबंधित नियम जाणून घेऊयात.

कचऱ्याच्या डब्बा कोणत्या दिशेला ठेवावा?

घराच्या ईशान्य दिशेला कधीही कचऱ्याच्या डब्बा ठेवू नये. या वास्तु नियमाकडे दुर्लक्ष केल्याने आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतात. शिवाय घराच्या पूर्व दिशेला कचऱ्याच्या डब्बा ठेवण्यासही मनाई आहे. यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळा येतो.

तुम्ही जर घराच्या दक्षिण व पश्चिम दिशेला कचऱ्याच्या डब्बा ठेवलात तर त्यामुळे नातेसंबंधांमध्ये अंतर निर्माण होऊ शकते आणि कुटुंबात भांडणे होऊ शकतात.

नैऋत्य दिशा ही कचऱ्याच्या डब्बा ठेवण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. पर्यायी म्हणून तुम्ही वायव्य दिशेलाही कचऱ्याच्या डब्बा ठेवू शकता. वास्तुनुसार या नियमाचे पालन केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करण्यापासून रोखली जाते आणि आर्थिक लाभ होऊ शकतो.

या गोष्टी लक्षात ठेवा

घरात नकारात्मक ऊर्जा पसरू नये म्हणून कचऱ्याच्या डब्बा नेहमी झाकणाने झाकून ठेवा. दररोज कचऱ्याच्या डब्बा रिकामी करा आणि पाण्याने स्वच्छ करा. तुटलेला किंवा खराब झालेला कचऱ्याच्या डब्बा घरात ठेवल्याने घरात गरिबी येते.

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कधीही कचऱ्याच्या डब्बा ठेवू नये, कारण मुख्य दरवाजातूनच लक्ष्मी देवीचे आगमन होते. वास्तुनुसार, ज्या घरात मुख्य प्रवेशद्वारावर कचऱ्याच्या डब्बा असतो तिथे लक्ष्मी देवी वास करत नाही.

वास्तुनुसार कचऱ्याच्या डब्बाशी संबंधित नियमांचे पालन केल्याने घरात शांती आणि आनंद राहतो आणि सकारात्मक ऊर्जा तिथे राहते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.