AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी मुंबईतील उड्डाणपुलावर धावती कार पेटली, पंढरपूरच्या ‘देवदुताने’ पाच जणांच्या कुटुंबाला कसं वाचवलं?

नवी मुंबईतील तळोजा उड्डाणपुलावर चालत्या गाडीने अचानक पेट घेतला. पेट घेतलेल्या गाडीने एकाच कुटुंबातील पाच जण प्रवास करत होते. दोन मुलं, एक मुलगी आणि आई-वडील असे पाच जण स्विफ्ट डिझायर कारने मुंबईहून पुण्याला निघाले होते.

नवी मुंबईतील उड्डाणपुलावर धावती कार पेटली, पंढरपूरच्या 'देवदुताने' पाच जणांच्या कुटुंबाला कसं वाचवलं?
नवी मुंबईतील तळोजा उड्डाणपुलावर कार पेटली
| Edited By: | Updated on: Feb 25, 2022 | 6:38 AM
Share

नवी मुंबई : चालत्या गाडीने अचानक पेट (Car Fire) घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. नवी मुंबईतील तळोजा उड्डाणपुलावर (Navi Mumbai) हा प्रकार घडला. पेट घेतलेल्या स्विफ्ट डिझायर गाडीत एकूण पाच जण प्रवास करत होते. मात्र सुदैवाने युवा उद्योजकाने प्रसंगावधान राखत या सर्वांचे प्राण वाचवले. पंढरपुरातील प्रसिद्ध उद्योजक आणि सहकारातील नेते अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी कारला लागलेली आग आटोक्यात आणली. त्यामुळे एकाच कुटुंबातील पाचही जणांचा जीव बचावला. दोन मुलं, एक मुलगी आणि आई-वडील असे पाच जण मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघाले होते, यावेळी नवी मुंबईतील तळोजा उड्डाणपुलावर गाडी धावत असताना अचानक आग लागली. अभिजीत पाटलांनी केवळ आगच विझवली नाही, तर घाबरलेल्या कुटुंबाला दिलासाही दिला.

काय आहे प्रकरण?

नवी मुंबईतील तळोजा उड्डाणपुलावर चालत्या गाडीने अचानक पेट घेतला. पेट घेतलेल्या गाडीने एकाच कुटुंबातील पाच जण प्रवास करत होते. दोन मुलं, एक मुलगी आणि आई-वडील असे पाच जण स्विफ्ट डिझायर कारने मुंबईहून पुण्याला निघाले होते.

उद्योजक अभिजीत पाटलांची धाव

नवी मुंबईतील तळोजा उड्डाणपुलावर पोहोचल्यानंतर त्यांच्या गाडीने अचानक पेट घेतला. त्यामुळे कुटुंबीय घाबरुन गेले. मात्र पंढरपूर शहरातील प्रसिद्ध उद्योजक आणि सहकारातील नेते अभिजीत पाटील यांनी प्रसंगावधान राखले आणि गाडीची आग नियंत्रणात आणली.

कारच्या आगीवर नियंत्रण

अभिजीत पाटील यांच्या प्रसंगावधानामुळे कारमधील कुटुंबीयांचे प्राण वाचले. घाबरलेल्या कुटुंबातील लोकांना दिलासा देत पाटील यांनी कारची आग विझवली. फायर डिस्टिंग्विशरच्या मदतीने त्यांनी आगीवर आगीवर नियंत्रण मिळवले. हा प्रकार उपस्थितांपैकी एकाने मोबाईल कॅमेरात कैद केला आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO | मुंबई-अहमदाबाद हायवेवर गाडी पेटली, प्रवासी बालंबाल बचावले, कार जळून खाक

VIDEO | भररस्त्यात मर्सिडीज पेटली, गोंदियातील आगीत कार जळून खाक

Pune | कामावरून काढून टाकल्याने चालकाने 22 लाखांची कार पेटवली

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.