तिला गावानं भूताळीन म्हंटलं, जगणंही मुश्किल केलं, पण…नंतर जे काही घडलं ते पाहून तिला…

| Updated on: Feb 07, 2023 | 4:55 PM

नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील भोरवाडी गावातील अंधश्रद्धेचे भूत उतरले आहे. अंधश्रद्धा निर्मूलत समितीने याबाबत पुढाकार घेतला होता.

तिला गावानं भूताळीन म्हंटलं, जगणंही मुश्किल केलं, पण...नंतर जे काही घडलं ते पाहून तिला...
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : पुरोगामी महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांच्या (Tribal society) मानगुटीवरील अंधश्रद्धेचे भूत अजूनही खाली उतरलेले नाही. नाशिकच्या इगतपुरी (Nashik Igatpuri News) तालुक्यातील भोरवाडी पाड्यावरील घटनेने हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. एका महिलेला संपूर्ण गावाने भूताळीन (Superstition) असल्याचं ठरवत तीचं जगणं मुश्किल केलं होतं. गावात घडणाऱ्या प्रत्येक दुर्दैवी घटनेला त्या महिलेला जबाबदार धरलं जात होतं. त्यामुळे गावात अंधश्रद्धेचं भूत किती मोठ्या प्रमाणात पसरलं होतं हे समोर आले होते. यातील काही नागरिकांनी घर सोडून स्थलांतरही केलं होतं. यानंतर अंनिसने यामध्ये हस्तक्षेप करत महिलेला न्याय मिळवून दिला आहे.

संपूर्ण महाराष्ट्राला काळिमा फासला जाईल अशीच घटना इगतपुरीच्या भोरवाडी पाड्यावर घडला होता. त्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर यामध्ये अंनिसने उडी घेतली आहे.

भोरवाडी पाड्यावरील एका महिलेला काही व्यक्तींनी भूताळीण ठरवलं होतं, गावात घडलेल्या घटनांना तिलाच जबाबदार धरलं जात होतं, त्यामुळे तिचे जगणं अक्षरशः जगणं मुश्किल झाले होते.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर संबंधित महिलेलाही राग आल्याने इतरांना दोष देण्यास सुरू केले होते, त्यावरून गावातील वातावरण चांगलेच गढूळ झाले होते, अंधश्रद्धेबाबत मोठा गैरसमज निर्माण झाला होता.

भुताटकी आणि जादूटोणावरुण भोरवाडीत मोठा गैरसमज आहे. महिलांमध्ये यावरून मोठ्या प्रमाणात भांडणे होत असत. त्यामुळे एका गावात राहणं सुद्धा अवघड झाले होते.

हीच बाब ओळखून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने थेट भोरवाडी पाडा गाठून सर्व प्रकार जाणून घेतला. त्याआधी मात्र घोटी पोलिसांत विनंती अर्ज दिला आणि सोबत एक पोलीस कर्मचारी गावात आले होते.

गावातील सर्व मंडळींना एकत्र आणण्यात आले होते. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. त्यानंतर अंनिसने प्रबोधन करत अंधश्रद्धा आहे हे पटवून दिले. गावकऱ्यांचे गैरसमजही दूर केले.

अंनिस इथवरच न थांबता महिलेच्या हातचे जेवण केले, तिच्या घरातील पाणीही पिऊन दाखविले. त्यानंतर गावकऱ्यांनी ते कबूल करत महिलेच्या घरातील अन्नही खाल्ले. यापुढे भांडण करणार नाही, एकोप्याने राहू असं आश्वासित केलं.

पुढील काळात कुणाला भुताळीन ठरवणारी नाही, असेही मान्य केले. यावेळी अंनिसने घेतलेली भूमिका गावकऱ्यांना पटली आणि त्यानंतर गावानेही अंधश्रद्धेवरुन वाद होणार नाही याचीही हमी दिली.

अंनिसचे राज्य सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, नाशिकचे कोमल वर्दे, सचिन महिरे, पोलीस हवालदार बी. आर. जगताप यांनी हा पुढाकार घेतला होता.