AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी : आधी कल्याण, आता ठाण्यात परप्रांतीय सुरक्षारक्षाकडून मराठी महिलेला बेदम मारहाण, धक्कादायक कारण समोर

गुरुवारी कल्याणमधील हायप्रोफाईल सोसायटीत मराठी कुटुंबावर हल्ला झाला होता, ही घटना ताजी असतानाच आता ठाण्यातही मराठी महिलेला मारहाण करण्यात आली आहे.

मोठी बातमी : आधी कल्याण, आता ठाण्यात परप्रांतीय सुरक्षारक्षाकडून मराठी महिलेला बेदम मारहाण, धक्कादायक कारण समोर
प्रातिनिधिक छायाचित्र
| Updated on: Dec 20, 2024 | 3:06 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, गुरुवारी कल्याणमधील एका हायप्रोफाईल सोसायटीमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला झाला, ही घटना ताजी असतानाच आता ठाण्यातूनही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यातील विवियाना मॉल परिसरातील ही घटना आहे. विविआना मॉलमधील परप्रांतीय सुरक्षा रक्षकाकडून महिला रिक्षा चालकाला मारहाण करण्यात आली आहे. मनसेकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून, या घटनेबाबत जाब विचारण्यासाठी मनसे नेते अविनाश जाधव आणि कार्यकर्ते विवियाना मॉलमध्ये पोहोचले आहेत.

भाडे नाकारल्याच्या वादातून मारहाण 

समोर आलेल्या माहितीनुसार ठाण्यातील विविआना मॉलमधील परप्रांतीय सुरक्षा रक्षकाने महिला रिक्षा चालकाला मारहाण केली आहे. मॉलमध्ये खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाचं भाडं नाकारल्याच्या वादतून ही मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे. मॉलमध्ये खरेदीसाठी आलेल्या ग्राहकानं या महिला रिक्षाचालकाकडे भाड्या बाबत विचारणा केली, मात्र या महिलेनं त्यांना आपल्या रिक्षातील गॅस संपला आहे, असं सांगितलं. त्यानंतर यावरून महिला रिक्षा चालक आणि या मॉलचा सुरक्षा रक्षक यांच्यामध्ये वाद झाला. सुरक्षा रक्षकाने अरेरावीची भाषा केल्यामुळे महिला रिक्षा चालक त्याच्या अंगावर धावून गेली, त्यानंतर या सुरक्षा रक्षकाने महिलेला मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या घटनेची दखल आता मनसेकडून घेण्यात आली आहे. या घटनेबाबत जाब विचारण्यासाठी मनसे नेते अविनाश जाधव आणि कार्यकर्ते विवियाना मॉलमध्ये पोहोचले आहेत.

दरम्यान कल्याणमध्ये देखील अशीच एक घटना घडली आहे, एका हायप्रोफाईल सोसायटीमध्ये गुरुवारी जोरदार राडा झाला. दोन परप्रांतीय कुटुंबांकडून एका मराठी कुटुंबाला शिविगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली आहे. कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाण प्रकरणात खडकपाडा पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. मात्र मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला अजूनही फरार आहे. यावरून आता राजकारण चांगलच तापलं आहे. राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप केले जात असल्याचं पाहायला मिळत आहे. मराठी कुटुंबानंतर आता एका मराठी महिलेला देखील परप्रातीयाकडून मारहाण करण्यात आली आहे.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं