विलीनीकरण आता होणारच नाही, पण… अजितदादांचं नाव घेत युगेंद्र पवारांचं मोठं विधान काय?

Yugendra Pawar : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार यांची आज बारामतीत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी विलीनीकरणाच्या मुद्द्यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.

विलीनीकरण आता होणारच नाही, पण... अजितदादांचं नाव घेत युगेंद्र पवारांचं मोठं विधान काय?
yugendra Pawar
Image Credit source: Google
| Updated on: May 25, 2026 | 3:39 PM

राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू होती, मात्र आता दोन्ही पक्ष्यांच्या नेत्यांनी आता विलीनीकरण होणार नाही अशी माहिती दिली आहे. अशातच आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार यांची आज बारामतीत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी विलीनीकरणाच्या मुद्द्यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. युगेंद्र पवार नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

विलीनीकरण आता होणार नाही

युगेंद्र पवार यांनी विलीनीकरणावर बोलताना म्हटले की, सगळेच जण याबाबत संभ्रमात होते. मात्र विलीनीकरण आता होणार नाही. आपली भूमिका आपण क्लियर केली पाहिजे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी देखील क्लियर केलं की विलीनीकरण होणार नाही. त्यांचा निरोप संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवावा यासाठी मी बोलत आहे. चर्चा होती, हे ठीक आहे; पण राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही.’

अजितदादांनी 100 टक्के…

विलीनीकरणाचा फटका युगेंद्र पवारांना बसला का यावर बोलताना त्यांनी म्हटले की, आपण अजित दादांसोबत जाणार होतो, विलीनीकरण जर झालं असतं तर पवार साहेबांनी आणि अजित दादांनी शंभर टक्के माझी काळजी घेतली असती हा विश्वास मला आहे. पुढे 2029 साली पवार विरुद्ध पवार असा सामना होणार का यावर बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, पवार विरुद्ध पवारच लढाई होईल याची काय खात्री आहे, पण उद्या काहीही होऊ शकते. मी तुम्हाला यापूर्वीही सांगितलं आहे, 2029 साठी आणखीन तीन वर्ष आहेत. एका वर्षात खूप काही गोष्टी बदलू शकतात, तुम्ही 2028 ला मला विचारा मग मी सांगतो.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पद मिळेल अशी इच्छा होती का यावर बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, इथे ज्यांचे डिपॉझिट जप्त झाले, त्यांना मोठी मोठी पदे मिळाली आहेत. कदाचित माझी चुकीचे अपेक्षा असू शकते. तसं काही झालं नाही आणि ते माझ्या फायद्याचं ठरलं. मला लोकांसाठी जास्त वेळ द्यायला मिळाला, लोकांमध्ये मी जावू शकलो. काही लोक पद घेतात पण पदाला न्याय देत नाहीत, मला तसं करायचं नव्हतं. मला पद मिळालं नाही त्यामुळे बारामतीकरांसाठी वेळ देता आला.

Follow Us