बाळासाहेबांचे वंशज स्वातंत्र्यवीर सावकरांच्या अभिनंदनाचा ठराव मांडतील का? : चंद्रकांत पाटील

भाजपच्यावतीन आज राज्यभरात महाविकास आघाडी सरकारच्याविरोधात धरणे आंदोलन पुकारण्यात आलं होतं. या आंदोलनात अडीच लाख नागरिक सहभागी झाल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला (Chandrakant Patil slams Shiv Sena).

बाळासाहेबांचे वंशज स्वातंत्र्यवीर सावकरांच्या अभिनंदनाचा ठराव मांडतील का? : चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Feb 25, 2020 | 5:11 PM

मुंबई : “स्वातंत्र्यवीर सावरकर यांची उद्या पुण्यतिथी आहे. महाराष्ट्र शासन स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिनंदनाचा ठराव मांडतं का? ते बघूया”, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. भाजपच्यावतीने आज राज्यभरात महाविकास आघाडी सरकारच्याविरोधात धरणे आंदोलन पुकारण्यात आलं होतं. या आंदोलनात अडीच लाख नागरिक सहभागी झाल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. मुंबईच्या आझाद मैदानातही धरणे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनानंतर भाजपची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला (Chandrakant Patil slams Shiv Sena).

“उद्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी आहे. बघूया महाराष्ट्र शासन सभागृहामध्ये त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडतं का? ज्या सावरकरांवर यांची प्रचंड भक्ती आणि श्रद्धा आहे, बाळासाहेबांना तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना कुणी काही म्हटलं तर चालायचं नाही. तर मग बाळासाहेबांचे वंशज सावरकरांच्या पुण्यतिथीची आठवण काढून सभागृहात अभिनंदनाचं भाषण करतात का ते बघूया”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“महाराष्ट्रात शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. महिलांवर अत्याचार, अन्याय वाढले आहेत. महाविकास आघाडी सरकारकडून सगळ्या चांगल्या गोष्टींना स्थगिती दिली जाते. पण पर्याय दिला जात नाही. आपल्याला महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांमध्ये, महिलांमध्ये जनजागृती करावी लागणार आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरत हे आंदोलन करावं लागलं”, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं (Chandrakant Patil slams Shiv Sena).

“प्रचंड मोठ्या संख्येने लोक या आंदोलनात सहभागी होत रस्त्यावर उतरले. 355 जणांचं आतापर्यंत वृत्त आलं आहे. तर अडीच लाख लोक आंदोलनात सहभागी झाले. मी कार्यकर्त्यांचं म्हणत नाही तर मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि महिला या आंदोलनात सहभागी झाले. हिंगणघाट सारख्या छोट्या शहरामध्ये अडीच हजार लोक आंदोलनात सहभागी झाले. नांदेडला अडीच हजार, पुण्यातही तीन हजार पेक्षा जास्त, तर मुंबईत सात ते आठ हजार लोक आंदोलनात सहभागी झाले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छोट्यातल्या छोट्या तालुक्यातसुद्धा लोक रस्त्यावर उतरले आणि आंदोलनात सहभागी झाले”, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.

‘राज्यपालांकडे शेतकऱ्यांचे 52 हजार पत्रं सूपूर्द करणार’

“राज्यपालांची आज सहा वाजता भेटीसाठी वेळ मिळाला आहे. कोल्हापूरचे अध्यक्ष हे शाहू महाराजांचे वंशज आहेत. समरजीतसिंह राजे घाटगे यांनी अध्यक्ष झाल्यानंतर पूर्ण जिल्ह्यामध्ये बारा हजार नागरिकांसोबत मोर्चा काढला. त्या लोकांच्या प्रतिसादानंतर त्यांनी लोकांना आाहन केलं होतं की तुम्ही राज्यपालांना पत्र लिहा. 52 हजार पत्रं त्यांनी गोळा केली. त्यात काहींनी स्वत:च्या रक्ताने पत्र लिहिलेली आहेत. ती सर्व पत्र घेऊन समरजीत राजे मुंबईत पोहचले आहेत. राज्यपालांकडे ही सर्व पत्र सूपूर्द करणार आहोत”, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

‘मुख्यमंत्री सभागृहात फक्त दहा मिनिटे थांबले आणि निघून गेले’

“महाराष्ट्राची विधानसभा कोणतेही कामकाज न होऊ देता आम्ही बंद पाडली. एवढ्या संवेदनशील विषयावर असं काही सुरु असताना मुख्यमंत्री सभागृहात फक्त दहा मिनिटे थांबले आणि निघून गेले. ते पुन्हा सभागृहात आले नाहीत. या गोष्टींच दु:ख झालं. आमचं विधानसभेचं सभागृह बंद पडणं हे लक्ष्य नाही त्याची तीव्रता लक्षात यायला हवी. आमचं म्हणणे एवढच होत की सर्व कामकाज बंद करा आणि शेतकरी कर्जमाफीवर आणि महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करा. विधान परिषदेतही आम्ही किल्ला लढवला आणि तेथेही सभागृह बंद पडले. आगामी काळात हा संघर्ष अजून तीव्र करणार आहोत”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.