AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानकडून 100 भारतीय कैद्यांची सुटका, वाघा बॉर्डरवर मायदेशात पहिलं पाऊल

वाघा बॉर्डर : पाकिस्तानकडून 100 भारतीय कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. चुकून पाकिस्तानच्या जलसीमेत प्रवेश करणाऱ्या भारतीय नागरिकांना अनेकदा अटक केली जाते. या भारतीय नागरिकांनी त्यांची शिक्षा पूर्ण करुनही सुटका करण्यात आली नव्हती. अखेर भारताने सातत्याने दबाव टाकल्यानंतर शिक्षा पूर्ण करुन 100 भारतीय नागरिकांनी मायभूमीत वाघा बॉर्डरवरुन प्रवेश केला. या महिन्यात 360 भारतीय कैद्यांची सुटका […]

पाकिस्तानकडून 100 भारतीय कैद्यांची सुटका, वाघा बॉर्डरवर मायदेशात पहिलं पाऊल
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM
Share

वाघा बॉर्डर : पाकिस्तानकडून 100 भारतीय कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. चुकून पाकिस्तानच्या जलसीमेत प्रवेश करणाऱ्या भारतीय नागरिकांना अनेकदा अटक केली जाते. या भारतीय नागरिकांनी त्यांची शिक्षा पूर्ण करुनही सुटका करण्यात आली नव्हती. अखेर भारताने सातत्याने दबाव टाकल्यानंतर शिक्षा पूर्ण करुन 100 भारतीय नागरिकांनी मायभूमीत वाघा बॉर्डरवरुन प्रवेश केला.

या महिन्यात 360 भारतीय कैद्यांची सुटका करण्यात येणार आहे. यामध्ये नागरिक आणि मच्छिमारांचा समावेश आहे. चार टप्प्यात या कैद्यांना सोडलं जाईल. ज्यापैकी 100 कैद्यांना आज सोडण्यात आलं. या कैद्यांचं वाघा बॉर्डरवर अधिकारी आणि कुटुंबीयांकडून स्वागत करण्यात आलं. याचप्रमाणे 14, 21 आणि 28 एप्रिलला इतरांची सुटका होणार आहे. प्रत्येक टप्प्यात 100 भारतीय येणार असून शेवटच्या टप्प्यात 60 भारतीय येतील.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तान उच्चायुक्तालयाला 385 भारतीय मच्छिमारांना सोडण्याची मागणी केली होती. यानंतर पाकिस्तानने हे पाऊल उचललं आहे. समुद्रात चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्यानंतर या मासेमारांना अटक करण्यात आली होती. पाकिस्तानच्या जेलमध्ये सध्या 385 मासेमार आहेत. या महिन्यात सोडण्यात येणाऱ्या कैद्यांमध्ये मराठी आणि गुजराती नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

पाकिस्तानच्या जेलमध्ये भारताचे 15 नागरिक आणि 385 मासेमार असे आहेत, ज्यांनी शिक्षा पूर्ण केली आहे. पण तरीही पाकिस्तानकडून सुटका केली जात नव्हती. पाकिस्तानच्या जेलमध्ये असलेल्या भारतीय कैद्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी भारताच्या डॉक्टरांना लवकरात लवकर व्हिसा द्यावा, अशीही मागणी भारताने केली होती.

Follow Us
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.