AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asaduddin Owaisi on BJP : भाजपने भारतातील मुस्लिमांविरुद्ध युद्ध पुकारले, असदुद्दीन ओवेसेंची भाजपसह इतर पक्षांवरती जोरदार टीका

त्यांना आमचा हक्क आमच्याकडून हिसकावून घ्यायचा आहे. तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला ते अयशस्वी ठरले आहेत. भाजपने मुस्लिमांविरुद्ध युद्ध पुकारले आहे. यूपीचा उल्लेख करत ओवेसी म्हणाले की, तुम्ही यूपीमध्ये भाजपाला मतदान केले.

Asaduddin Owaisi on BJP : भाजपने भारतातील मुस्लिमांविरुद्ध युद्ध पुकारले, असदुद्दीन ओवेसेंची भाजपसह इतर पक्षांवरती जोरदार टीका
भाजपने भारतातील मुस्लिमांविरुद्ध युद्ध पुकारलेImage Credit source: twitter
| Updated on: May 07, 2022 | 7:35 AM
Share

नवी दिल्ली – असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी हैदराबादच्या (Hyderabad) सरूरनगरमध्ये झालेल्या हत्येवर काल मौन सोडले आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो असे ते म्हणाले आहेत. त्या प्रकरणात मुलीने मर्जीने लग्न केले होते. त्या गोष्टीला कायद्यात परवानगी आहे. मात्र मोदी जहांगीरपुरी, सेंडवा, खरगोनवर या प्रकरणावर बोलणार आहेत का ? असा सवाल त्यांनी पंतप्रधानांना केला आहे. ओवेसी यांनी दिंडोरीचाही उल्लेख केला आहे. आसिफने मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) दिंडोरी येथे साक्षीशी लग्न केले तेव्हा त्याचे घर पाडण्यात आले. ज्या इसमाने अखलाकची हत्या केली त्याचा हार घालून सत्कार केला. झालेल्या सगळ्या घटनांवर पंतप्रधान कधी बोलणार आहेत का ? अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

ओवेसी यांनी भाजप आणि इतर विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली

असदुद्दीन ओवेसी यांनी भाजप आणि इतर विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. भारतातील मुस्लिमांनी त्यांचे राजकीय नेतृत्व तयार करायला पाहिजे. जोपर्यंत मुस्लिम आपले प्रतिनिधी निवडत नाहीत. तोपर्यंत द्वेषाचे वादळ कधीचं थांबणार नाही. ज्यांना तुमचा रक्तपात करायचा आहे. ते कधीही थांबणार नाहीत. यासाठी तुम्हाला राजकीय नेतृत्व तयार करायला पाहिजे. ज्यावेळी मुस्लिम प्रतिनिधी तयार होतील त्यावेळी अशा प्रकरणाला कुठेतरी आळा बसेल.

आमचा हक्क आमच्याकडून हिसकावून घ्यायचा आहे

त्यांना आमचा हक्क आमच्याकडून हिसकावून घ्यायचा आहे. तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला ते अयशस्वी ठरले आहेत. भाजपने मुस्लिमांविरुद्ध युद्ध पुकारले आहे. यूपीचा उल्लेख करत ओवेसी म्हणाले की, तुम्ही यूपीमध्ये भाजपाला मतदान केले. त्याचे काय परिणाम झाले, युपीत भाजप जिंकला. तुम्ही तुमच्या प्रतिनिधींना विजयी केले असते तर आज त्यांनी तुमच्यासाठी संघर्ष केला असता. तुम्ही सरकार बदलू शकत नाही. तुम्ही हे सगळं प्रकरण समजून घेतले पाहिजे. सरकार बदलण्याचे आवाहन करणारे आज कुठे आहेत? आमचा पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यात जाईल. आम्ही बिहारमध्ये लोकसभा निवडणूक सुध्दा लढवू असं ओवेसी म्हणाले.

समाजवादी पक्ष शांत का ?

यूपीमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचारावर समाजवादी पक्षाकडून कोणतेही वक्तव्य अद्याप करण्यात आलेलं नाही. असा एकही दिवस नाही इथे मुस्लिमांना लक्ष्य केले जात नाही. जहांगीरपुरी मशिदीसमोरील गेट तोडण्यात आले, तिथे सुध्दा कोणी दिसले नाही.

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.