BRICS Summit : ब्रिक्स शिखर परिषदेमुळे भारताच्या पदरात काय पडलं? अमेरिकन तज्ज्ञाची महत्त्वाची प्रतिक्रिया
ब्रिक्स शिखर परिषदेमुळे भारताच्या पदरात काय पडलं, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. यावर आता अमेरिक घडामोडींच्या तज्ज्ञांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

भारताची राजधानी दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषद पार पडत आहे. या ब्रिक्स शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. या 18 व्या शिखर परिषदेवर अमेरिका आणि दक्षिण आशियातील घडामोडींचे तज्ज्ञ मायकल कुगलमॅन यांनी शनिवारी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ब्रिक्स शिखर परिषद ही भारतासाठी मोठी संधी आहे. आंतरराष्ट्रीय व्यवस्था आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील वाढत्या अस्थिरतेदरम्यन परिषद विकसनशील देशांना नवीन व्यासपीठ उपलब्ध झालं आहे, असेही त्यांनी सांगितले.
कुगलमॅन यांनी म्हटलं की, पश्चिम आशियातील तणाव, अमिरेका विरोधाविषयी एकमत घडवून आणणे मोठं आव्हान असणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कुगलमॅन यांनी म्हटलं की, जागतिक आर्थिक आणि वित्तीय सिस्टिममध्ये संपूर्ण जगात अस्थिरता पसरली आहे. असंतोष वाढत असताना ब्रिक्स शिखर परिषद नवीन योगदान देऊ शकते. या परिषदेदरम्यान भारताला जागतिक नेतृत्व मजबूत करण्याची संधी आहे. त्याचबरोबर ग्लोबल साऊथमध्ये प्रयत्न दुप्पट करण्याची संधी उपलब्ध होते. खरंतर भारतासाठी परराष्ट्र धोरण प्रथम प्राधान्य आहे.
कुगलमॅन यांनी इशारा दिला आहे की, भारताच्या शिखर परिषदेचं यश हे संयुक्त निवेदनाच्या क्षमतेवरून ठरेल. ब्रिक्स शिखर परिषदेत सर्वांचं एकमत करून निवदेन जारी करणे महत्त्वाचं आहे. तसेच या समूहाची सदस्य संख्या वाढवणे भाविष्यासाठी मोठं आव्हान असणार आहे. कारण अनेक देशांची सहमती मिळवणे अवघड बाब असते.
कुगलमॅन यांनी भारताच्या राजनैतिक संतुलनासाठी दोन आव्हाने असल्याचे सांगितले. पहिलं आव्हान म्हणजे इराण आणि यूएई या दोन्ही देशांच्या ब्रिक्समध्ये समावेश असल्याने इराण युद्धाच्या मुद्द्यावर एक सारखी भूमिका शोधणे अवघड बाब मानली जात आहे. दुसरे आव्हान म्हणजे अमेरिका फॅक्टर आहे. कारण रशिया-इराण आणि चीनला अमेरिकेच्या विरोधात तीव्र भाषा वापरायची आहे. परंतु भारत आणि इतर सदस्यांना अशी भाषा वापरायची नाही. भारत हा अमेरिकेसोबत व्यापारी करारासाठी वाटाघाटी करण्यात गुंतलेला आहे. या परिषदेत उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, जागतिक स्तरावर व्यापारी अडथळे वाढत असताना भारत आर्थिक पूल बांधत असल्याचे स्पष्ट केले.