AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत-बांग्लादेशाच्या सीमेवर गुन्हे रोखणार मधमाशा, पाहा काय आहे बीएसएफची योजना

केंद्र सरकारने बीएसएफ सोबत वायब्रंट व्हिलेज प्रोग्रॅम ( व्हीव्हीपी ) अंतर्गत एक अनोखी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत भारत-पाकिस्तानच्या सीमेवर मधमाशांची पोळी उभारण्यात येणार आहेत.

भारत-बांग्लादेशाच्या सीमेवर गुन्हे रोखणार मधमाशा, पाहा काय आहे बीएसएफची योजना
Natural BeehiveImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Nov 05, 2023 | 7:29 PM
Share

मुंबई | 5 नोव्हेंबर 2023 : भारत आणि बांग्लादेशाच्या सीमेवर बीएसएस ( सीमा सुरक्षा दल ) गुरांच्या तस्करीसह अन्य गुन्हे रोखण्यासाठी एक वेगळा प्रयोग करणार आहे. एका योजनेनुसार भारताचे सीमा सुरक्षा दल आता भारत-बांग्लादेशाच्या सीमेवर मधमाशांचे पालन करणार आहे. या सीमेवर मधमाशांचे पोळे लावल्याने स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी देखील मिळतीय अशी एकंदर योजना आहे. 2 नोव्हेंबरपासून बीएसएफच्या 32 व्या बटालियन मार्फत ही योजना सरु करण्यात आली आहे.

भारत आणि बांग्लादेश मिळून तब्बल 4,096 किलोमीटर लांबीची सीमा आहे. यातील 2,217 किमी लांबीची सीमा पश्चिम बंगालला लागून आहे. सीमीवर मधमाशांचे पालन करण्याच्या योजनेमध्ये केंद्र सरकारचे आयुष मंत्रालयाने देखील सामील झाले आहे. आयुष मंत्रालयाने बीएसएफला मधमाशांची पोळी आणि मिश्र धातूंनी तयार केलेल्या स्मार्ट तारांच्या जाळ्याही दिल्या आहेत. त्यामुळे मधमाशा कशा पाळायच्या याचे तंत्रज्ञान आयुष मंत्रालयाने पुरविले आहे.

या योजनेची कल्पना राबविण्याच्या निर्णय घेणारे 32 व्या बटालियनचे कमाडंट सुजीत कुमार यांनी सांगितले की केंद्राने वायब्रंट व्हिलेज प्रोग्रॅम ( व्हीव्हीपी ) अंतर्गत ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. बीएसएफने एक पाऊल पुढे जात फुलांची रोपे पुरविण्याची मागणी आयुष मंत्रालयाकडे केली आहे. या मधमाशांच्या पोळ्यांशेजारी ही फुलझाडे लावण्याची योजना आहे. त्यामुळे मधमाशांना मोठ्या प्रमाणावर परागकण गोळा करून मध तयार करता येईल.

ग्रामीण शेतकऱ्यांचा पाठिंबा

भारत-बांग्लादेशाच्या सीमाभागात मधमाशांची पोळी तयार करण्याच्या योजनेची अमंलबजावणी करण्यास 2 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. मधमाशांची ही पोळी मधमाशा पालन करणाऱ्या स्थानिय शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर असावीत असा केला जात केला आहे. या योजनेचे शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.

Follow Us
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.
मोठं संकट? वैजापूरमध्ये संध्याकाळी अचानक विमानाच्या घिरट्या...
मोठं संकट? वैजापूरमध्ये संध्याकाळी अचानक विमानाच्या घिरट्या....
अशोक खरात प्रकरणात नवी नावं समोर; संजय राऊतांची प्रतिक्रिया चर्चेत
अशोक खरात प्रकरणात नवी नावं समोर; संजय राऊतांची प्रतिक्रिया चर्चेत.
इराण-अमेरिका तणावावरून राऊतांचा ट्रम्पवर निशाणा; भाजपवरही जोरदार टीका
इराण-अमेरिका तणावावरून राऊतांचा ट्रम्पवर निशाणा; भाजपवरही जोरदार टीका.
भोंदूबाबा खरातला आमदार करायचं होतं? तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा काय?
भोंदूबाबा खरातला आमदार करायचं होतं? तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा काय?.
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.