पेट्रोलबाबत सरकारचा नवा अत्यंत मोठा निर्णय, मोठा दणका, थेट इंधनावरील..

इराण आणि अमेरिका युद्धाचा भारताला मोठा फटका आहे. यादरम्यानच अर्थव्यवस्थेवरील ताण दूर करण्याकरिता केंद्र शासनाकडून मोठे पाऊले उचलली जात आहेत. आता तेल कंपन्यांना जोरदार धक्का देणारा निर्णय सरकारकडून घेण्यात आला.

पेट्रोलबाबत सरकारचा नवा अत्यंत मोठा निर्णय, मोठा दणका, थेट इंधनावरील..
Oil Companies
| Updated on: May 16, 2026 | 8:12 AM

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ केंद्र सरकारकडून करण्यात आली. तब्बल 3 रूपयांनी पेट्रोल आणि डिझेल वाढले आहे. इराण आणि अमेरिका युद्धाचा भारतात थेटपणे फटका बसताना दिसत आहे. एक तर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा आणि त्यातच आता किमतीमध्ये वाढ झाली. होर्मुज खाडी बंद असल्याने ऊर्जेचे संकट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलची बचत करण्याचे आवाहन जनतेला केले. मुंबईत पेट्रोल आणि डिझेलची टंचाई बघायला मिळतंय. यादरम्यान सरकारकडून आता ग्राहकांनंतर थेट पेट्रोलियम कंपन्यांना मोठा दणका देण्यात आला. पेट्रोलियम कंपन्यांच्या नफ्यालाही मोठा धक्का सरकारकडून देण्यात आला. पेट्रोलियम कंपन्यांच्या परदेशी नफ्याला आळा घालण्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

सरकारने पेट्रोल निर्यातीवर प्रति लिटर 3 रुपये अतिरिक्त नफा कर लावला आहे. हा थेट पेट्रोलियम कंपन्यांसाठी मोठा धक्का म्हणावा लागणार आहे. याचा थोडक्यात अर्थ असा होतो की, एखाद्या पेट्रोलियम कंपनीने परदेशात पेट्रोल निर्यात केले तर तिला मिळणाऱ्या नफ्यावर सरकारला प्रति लिटर 3 रुपये कर भरावा लागेल. हा सरकारचा अत्यंत मोठा निर्णय म्हणावा लागेल.

बऱ्याच तेल कंपन्या परदेशात पेट्रोल निर्यात करतात. आता त्यावरही सरकारकडून शुल्क आकारण्यात आले. अशा तेल कंपन्यांना सरकारला पैसा द्यावा लागणार आहे. इराण आणि अमेरिका युद्धात भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसत आहे. गेल्या काही दिवसांपासून डॉलरपुढे रूपयाची किमती कमी होत आहे. यामुळेच केंद्र सरकारने काही गोष्टी नियंत्रणात आणण्याकरिता महत्वाचे आदेश काढली आहेत.

साखरेच्या निर्यातीवरही केंद्र सरकारने लगाम लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला आवाहन करत सोने खरेदी न करण्यास सांगितले. नरेंद्र मोदी यांनी 1 वर्षाकरिता सोने न खरेदी करण्याचे आवाहन केले. इराण आणि अमेरिका युद्ध पुढील काही दिवस चालले तर स्थिती अधिक गंभीर होऊ शकते. होर्मुज खाडीत अजूनही भारताने मोठ्या प्रमाणात तेलवाहून जहाज अडकून पडली आहेत.

Follow Us