CJP चा संताप, सरकारला फुटला घाम, थेट सौरव दासने केली पोलखोल, बैठकीत..
कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास याने नुकताच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमधून सरकारला थेट इशारा देण्यात आला. पुन्हा एकदा कॉकरोच जनता पार्टी मोठे आंदोलन सुरू करू शकते. कॉकरोच जनता पार्टी आणि सरकार आमने सामने येताना दिसतंय.

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाने देशात खळबळ उडाली. थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात कॉकरोच जनता पार्टीचे मोठे आंदोलन झाले. जंतर मंतरवरील या आंदोलनात देशभरातून विद्यार्थी दाखल झाले. देशातील अनेक शहरात विद्यार्थी रस्त्यावर उतरले. जेंनझींनी सरकारविरोधात भूमिका घेतली. अखेर सरकार झुकले आणि त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. आंदोलक आक्रमक भूमिका घेताना दिसले. आता पुन्हा एकदा सरकारला मोठा इशारा कॉकरोच जनता पार्टीकडून देण्यात आला. कॉकरोच जनता पार्टीने सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे अधिकाऱ्यांना आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेल्या एफआयआरचा (FIR) तपास सुरू ठेवण्याची परवानगी मिळाली आहे.
CJP चे म्हणणे आहे की, हा आदेश सरकारसोबतच्या चर्चेदरम्यान दिलेल्या त्या आश्वासनांशी विसंगत आहे, ज्यानंतरच आम्ही आंदोलन मागे घेतले. जर सरकारने असे केले नाही तर आम्ही पुन्हा देशात मोठे आंदोलन उभे करू. पुन्हा एकदा सरकार आणि कॉकरोच जनता पार्टी आमने सामने येताना दिसत आहे. यादरम्यानच कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते साैरभ दासने मोठे विधान केले.
नुकताच सौरव दास याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने सरकारला इशारा दिला. सौरव दास याने मुलाखतीमध्ये म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, अगोदर दाखल करण्यात आलेले एफआयआर मागे घेतले जाणार नाहीत. सरकारसोबतच्या आमच्या चर्चेदरम्यान अशा कोणत्याही मुद्द्यावर चर्चा झाली नव्हती. सरकारसोबतचा आमचा समझोता वेगळा होता.
आम्हाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता सरकारने करावी, अशी आमची अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या अटी आम्हाला मान्य नाहीत. जर सरकारने या एफआयआर मागे घेतल्या नाही तर मोठे आंदोलन सुरू होईल, असेही सौरव दासने यादरम्यान म्हटले. पुन्हा एकदा मोठे आंदोलन उभारण्याच्या तयारीत कॉकरोच जनता पार्टी आहे. ज्यामुळे सरकारचे टेन्शन वाढल्याचे बघायला मिळत आहे. त्यात आता दिल्लीत मोठ्या घडामोडी सुरू आहेत.