भारत घाणेरडा… मी जर तिथे असते तर कधीच पेप्सिकोची सीईओ झाले नसते, इंदिरा नूयीचे विधानाने भारतात खळबळ, थेट..

आपण विदेशात असलो तरीही भारताचे नाव निघाले तरीही आपल्याला एक वेगळाच अभिमान वाटतो. कारण आपण इथे जन्मतो आणि मोठे होतो. मात्र, नुकताच भारताबद्दल मुळ भारतीय असलेल्या प्रतिष्ठित कंपनीच्या सीईओ धक्कादायक विधान केले, ज्याने एकच खळबळ उडाली.

भारत घाणेरडा... मी जर तिथे असते तर कधीच पेप्सिकोची सीईओ झाले नसते, इंदिरा नूयीचे विधानाने भारतात खळबळ, थेट..
Indira Nooyi
| Updated on: Jul 02, 2026 | 12:20 PM

जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असलो तरीही आपल्याला आपल्या देशाचा अभिमान वाटतो. मी एक भारतीय असल्याचे सांगताना मनात अभिमान आणि एक वेगळीच शक्ती असते. मात्र, पेप्सिकोच्या माजी सीईओ आणि मुळ भारतीय असलेल्या इंदिरा नूयी यांनी भारताबद्दल जे काही विधान केले, ज्याने पायाखालची जमीन सरकेल. भारतात जन्म घेतला, भारतात वाढल्या त्यानंतर विदेशात जाऊन इंदिरा नूयी यांनी भारताबद्दल धक्कादायक विधाने त्यांच्या मुलाखतीत केले. इंदिरा नूयी यांनी नुकताच एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी भारत आणि चीनची तुलना केली. भारत कसा खराब देश आणि चीन कसा चांगला यावर त्यांनी वारंवार विधान केले. इंदिरा नूयी यांच्या या मुलाखतीनंतर भारतात त्यांच्याविरोधात संताप वाढताना दिसतोय. इंदिरा नूयी यांनी हुवर इंस्टिट्यूशनला मुलाखत दिली.

इंदिरा नूयी यांनी म्हटले की, मी जर अमेरिकेत आले नसते तर मी कदाचित इथपर्यंत पोहोचूही शकले नसते. भारतात राहून इर्थपर्यंत पोहोचणे तर अजिबातच शक्य नव्हते. आपल्या खिशात काहीही न घेऊन येता अमेरिकेतली एका प्रतिष्ठित कंपनीची मी सीईओ बनले. असे जगातील कोणत्याच देशात होत नाही. मी भारतात राहून कधीच सीईओ बनू शकले नसते.

एक पर्यटक म्हणून भारतापेक्षा चीनमध्ये तुम्ही अधिक चांगला वेळ घालू शकता. जर तुम्हाला स्वच्छ जीवनशैली घालवायला इच्छा असेल तर भारतात तुम्ही राहूच शकत नाहीत. भारताची सुंदरता त्याच्या अव्यवस्थेत आहे. ज्या लोकांना स्वच्छ राहिला आवडते त्यांना भारत कळूच शकत नाही. माझ्या आजीने आणि वडिलांनी मला भारत सोडून अमेरिकेत जाण्यासाठी प्रेरित केले.

भारत आणि अमेरिकेच्या संबंधांवर बोलताना दिरा नूयीने म्हटले की, भारत आणि अमेरिका नैसर्गिक पार्टनर आहेत.भारताच्या सुरक्षेवर बोलताना त्यांनी म्हटले की, भारताच्या सुरक्षेसाठी अमेरिकेसोबत चांगले संबंध गरजेचे आहेत. भारताच्या स्वातंत्र्यानंतर माझा जन्म सात ते आठ वर्षांनी झाला. त्यावेळी एक नवा भारत होता. त्यावेळी समाजात महिलांकडे कोणतीही मोठी ताकद नव्हती. जास्त करून महिला या त्यावेळी घरातच राहत. त्यावेळी माझ्या आजीने आणि वडिलांनी मला जग जिंकण्यासाठी आणि स्वप्ने बघण्यासाठी मला प्रेरित केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us