हनीमूनला जाताच पत्नीला पीरियड्स आले, त्यानंतर पतीने जे काही केलं ऐकून धक्काच बसला

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीमध्ये पतीवर गंभीर आरोप केले आहेत. हनीमूनला गेल्यावर पीरेड्स आल्यानंतर त्याने जे काही केलं ते ऐकून धक्काच बसला आहे.

हनीमूनला जाताच पत्नीला पीरियड्स आले, त्यानंतर पतीने जे काही केलं ऐकून धक्काच बसला
हनीमून
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 17, 2026 | 11:18 AM

Honeymoon Case: लग्न झाल्यानंतर एकमेकांची ओळख व्हावी, प्रेम फुलावे यासाठी अनेक जोडपे हनिमूनला जातात. आयुष्यभरासाठी पुरतील अशा आठवणी जोडपे गोळा करतात. लग्न ठरल्यापासून झालेली धावपळ, लग्नाची गडबड, आर्थिक बाबींची जुळवाजुळव आणि त्यातून निर्माण झालेला ताण थोडा हलका होण्यासाठी हनिमून उपयोगी ठरतो. पण गोरखपूरमधील एका जोडप्याचा हनिमून लग्न मोडण्यासाठी कारणीभूत ठरला.

नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील एका महिलेने पतीवर आरोप केला आहे की अंदमान आणि निकोबार येथे हनीमूनदरम्यान मासिक पाळी आल्याने पतीने मारहाण केली. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवर तिचा पती, सासू आणि नणदेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. रामगढ़ताल परिसरातील रहिवासी असलेल्या या महिलेने तक्रारीत आरोप केला की तिचा पती आणि दिल्ली निवासी निखिल मिश्रा यांनी मासिक पाळी आल्याच्या मुद्द्यावर नाराज होऊन तिच्या खानाखाली लगावली, लाथा मारत मारहाण केली तसेच गळा दाबण्याचा प्रयत्न केला.

महिलेने सांगितले की तिचे ओरडणे ऐकून हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केला आणि कथित मारहाण थांबवली. तक्रारीनुसार, महिलेचा विवाह ३० मे २०२३ रोजी दिल्लीतील एका मॅरेज लॉनमध्ये झाला होता. तिने आरोप केला की लग्नापूर्वी सासरच्या लोकांनी तिच्या कुटुंबाकडून दिले जाणाऱ्या सामानाचे ब्रँडेड असणे आवश्यक असल्याचे आग्रह धरला होता.

महिलेचा दावा आहे की तिच्या वडिलांनी हुंडा म्हणून सुमारे २० लाख रुपये रोख, एक कार आणि सुमारे ४० लाख रुपये किमतीचे इतर सामान दिले होते. ती २ जूनला दिल्लीस्थित सासरच्या घरी गेली होती. तिने आरोप केला की त्यानंतर सासरच्या लोकांनी हुंड्यात दिलेल्या सामानाबाबत तिला टोमणे मारले आणि अपमानित केले. लग्नानंतर सुमारे एक महिन्याने ०४ जुलैला ती आपल्या पतीसोबत हनीमूनसाठी अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाला गेली होती.

हुंड्याबाबत छळ करण्याचाही आरोप

तक्रारीनुसार, प्रवासादरम्यान मासिक पाळी आल्यानंतर तिला पोटात तीव्र वेदना आणि जास्त रक्तस्राव झाला. महिलेने आरोप केला की तिच्या पतीने तिला विचारले की तिने आधी मासिक पाळी येण्याची माहिती का दिली नाही आणि त्यानंतर तिला मारहाण केली. नंतर पतीने तिच्या वडिलांना फोन करून त्यांना दिल्लीला येऊन तिला परत नेण्याचे सांगितले. त्याने म्हटले की तो तिच्यासोबत राहू इच्छित नाही.

१५ ऑगस्टला नोंदवली तक्रार

महिलेच्या म्हणण्यानुसार, ती परत सासरच्या घरी आली, पण तिच्या सासू आणि नणंदने तिच्या पतीचा पक्ष घेतला. नंतर तिला अधिक त्रास दिला. महिलेने दावा केला की लग्नानंतर सुमारे ४५ दिवसांनी १४ जुलै २०२३ रोजी तिला सासरच्या घरातून हाकलून देण्यात आले. तिने हेही आरोप केले की हुंड्याचे सामान परत केले गेले नाही आणि तिचा पती सतत तिला धमकीचे संदेश पाठवत राहिला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us