मोठी बातमी ! भारतात येणाऱ्यांना दिलासा, केंद्राने व्हिसावरील बंदी हटवली
केंद्रीय गृहमंत्रालयाने काढलेल्या आदेशानुसार ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया (OCI) आणि पर्सन ऑफ इंडियन ओरिजीन (POI) व्हिसाधारक तसेच विदेशी नागरिकांना भारतात येण्यास परवानगी देण्यात आली आहे.
नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिसावर घातलेली बंदी आता केंद्र सरकारने उठवली आहे. नव्या आदेशानुसार ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया, (OCI) पर्सन ऑफ इंडियन ओरिजीन (POI) व्हिसाधारक तसेच परदेशी नागरिकांना भारतात येण्यास परवानगी देण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक, पर्यटन आणि वैद्यकीय व्हिसा असणाऱ्यांना देशात येण्यास अजूनही बंदीच राहील. त्यांच्यासाठी कोणतेही नियम शिथील केलेले नाहीत.
वैद्यकीय व्हिसासाठी अर्ज करण्यास मुभा
नव्या आदेशानुसार OPI, POI आणि परदेशी नागरिक व्यापार, सम्मेलन, रोजगार, शिक्षण या कारणांसाठी भारतात येऊ शकतात. वैद्यकीय उपाचासाठी भारतात यायचे असेल तर त्यासाठी वैद्यकीय व्हिसासाठी अर्ज करावा लागेल. रुग्णासोबत आणखी एकाला भारतात येता येईल.
Under this graded relaxation, Government to restore with immediate effect all existing visas (except electronic visa, Tourist Visa & Medical Visa). Foreign nationals intending to visit India for medical treatment can apply for a Medical Visa including for medical attendants: MHA https://t.co/pusOKpPz2g
— ANI (@ANI) October 22, 2020
कोरोनाविषयक नियमांचे पालन करणे गरजेचे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात येण्यासाठी सरकारने काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. परदेशी नागरिकांना भारतात आल्यानंतर या गाईडलाईन्सचे पालन करावे लागेल. सर्वात आधी त्यांना क्वारन्टाईन व्हावे लागेल. क्वारन्टाईनचा काळ पूर्ण केल्यानंतरच त्यांना बाहेर फिरण्यास मुभा असेल.
दरम्यान कोरोना संसर्ग पाहता 23 मार्चपासून देशात आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर जवळपास दोन महिन्यानंतर म्हणजेच 25 मेला काही प्रादेशिक विमान उड्डाणांना केंद्र सरकारने परवानगी दिली होती. विदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी मिशन वंदे भारतही केंद्र सरकारने राबवलं होतं.
All OCI and PIO card-holders and all other foreign nationals intending to visit India for any purpose, except on a Tourist Visa, are permitted to enter by air or water routes through authorized airports and seaport immigration check posts: Ministry of Home Affairs (MHA) pic.twitter.com/BZrtGyxUtm
— ANI (@ANI) October 22, 2020
संबंधित बातम्या :
Vacation Trip | भारताशेजारील ‘या’ देशांमध्ये फिरण्यासाठी व्हिसाची गरज नाही!
Corona | 15 एप्रिलपर्यंत परदेशी नागरिकांना भारत बंदी, सर्व व्हिसा रद्द, भारताचा मोठा निर्णय