कृष्ण बनून सजला, पण गळ्यातील माळच ठरली जीवघेणी, एकुलत्या एक आर्यनचा दुर्दैवी मृत्यू
कधी काय होईल सांगता येत नाही. असंच काही आर्यन याच्या आई - वडिलांसोबत झालं आहे. आई - वडिलांनी आर्यन याला कृष्णासारखं सजवलं पण त्याच्या गळ्यातली माळच जीवघेणी ठरली... माळेतील एका मण्याने आर्यनया जीव घेतला.

जन्माष्टमीमुळे अनेक आई – वडील त्यांच्या मुलांना कृष्णासारखं सजवतात. आर्यन याच्या आई – वडिलांनी देखील त्यांच्या मुलाला कृष्णासारखं सजवलं होतं. आई – वडिलांना सहा वर्षांच्या आर्यन याला कृष्णाचा ड्रेस घातला आणि गळ्यात एक माळ घातली. अशात गळ्यात घातलेल्या माळेतील एक मणी आर्यन याने गिळला, ज्यामुळे त्याचं निधन झालं. असं देखील सांगितलं जात आहे की, श्वासनलीकेत मणी अडकल्यामुळे आर्यन याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्याचा मृत्यू झाला. सर्वात धक्कादायक सत्य म्हणजे आर्यन त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.
कृष्णवेशात सजलेला आर्यन
जन्माष्टमीनिमित्त देशभरात मुलांना भगवान श्रीकृष्णाच्या वेशभूषेत सजवलं जात होतं. याचप्रमाणे, रोहतास जिल्ह्यातील भागीरथ गावातील रहिवासी विमलेश यादव यांनी आपला सहा वर्षांचा मुलगा आर्यन यादव याला ‘कान्हा’च्या वेशभूषेत सजवलं. आर्यन याने पिवळ्या रंगाचे कपडे घातले होते आणि गळ्यात मोत्यांची माळ घातली होती. आपल्या एकुलत्या एका मुलाला कृष्णवेशात पाहून कुटुंबाला खूप आनंद झाला आणि संपूर्ण घरात जन्माष्टमीचा उत्साह संचारला.
माळेचा मणी गिळल्याने प्रकृती बिघडली
आर्यन याने गळ्यात घातलेल्या जपमाळेचा एक मणी गिळल्याची मााहिती समोर आली आहे. मणी गिळताच त्याची प्रकृती बिघडू लागली. यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेले. रुग्णालयात उपचार सुरु असताना आर्यन याचं निधन झालं. सर्वांना असं वाटलं की, उपचारानंतर आर्यन याची प्रकृती स्थिर होईल. पण असं झालं नाही. एका मणी आर्यन याच्यासाठी काळ ठरला. अखेर वेळ आल्यानंतर आर्यन याने शेवटचा श्वास घेतला.
मुलांना सजवताना काळजी घ्या…
आर्यनच्या मृत्यूमुळे मुलांना सजवताना घ्यावयाच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न निर्माण झाले आहेत. मुलांच्या गळ्यात हार, मण्यांच्या माळा, लहान दागिने किंवा अशी कोणतीही वस्तू घालताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे, जी मुले सहजपणे आपल्या तोंडात घालू शकतात. जन्माष्टमीनिमित्त आपल्या मुलाला ‘कान्हा’च्या वेशभूषेत सजवून हा दिवस आनंदी आणि अविस्मरणीय बनवण्याचा त्या कुटुंबाचा मानस होता; मात्र, तो दिवस त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या शोकांतिकेत बदलला.