जोशीमठमध्ये का होतंय भुस्खलन, संशोधकांनी काय म्हटलं?

| Updated on: Jan 11, 2023 | 4:27 PM

जोशीमठ ही परिस्थिती का निर्माण झाली आहे हा आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे. यासंदर्भात शास्त्रज्ञांचे स्वतःचे तर्क आहेत. यासंदर्भात चार प्रमुख संशोधन झाली आहे. ज्यात संशोधकांनी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी कारणे दिली आहेत.

जोशीमठमध्ये का होतंय भुस्खलन, संशोधकांनी काय म्हटलं?
जोशीमठमध्ये भुस्खलन होत असल्याने नागरिकांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे
Follow us on

जोशीमठ : Joshimath Crisis : उत्तराखंडमधील जोशीमठ (Joshimath Sinking) भूस्खलन होत आहे. या भागातील ७२३ घरांना तडे गेली आहे. यामुळे बद्रीनाथ धामच्या (Badrinath Dham) मुख्य मार्गावरील अडचणी दिवसांदिवस वाढत असल्याने चारधाम यात्राच संकटात आली आहे. आता सरकारने जोशीमठमधील लोकांचे स्थालांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या घरांना तडे गेली आहेत त्या ७२३ घरांना दीड लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. स्थलांतरासाठी ५० हजार दिले जातील तर भरपाई म्हणून सध्या एक लाख रुपये दिले जाणार आहे. एकूण किती रक्कम देणार ही कालांतराने निश्चित करण्यात येणार आहे.

जोशीमठमध्ये घरांना तडे पडता. भुस्खलन होत आहे. अचानक होणाऱ्या या प्रकारामुळे घबराहट निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांमध्ये घबरले आहे. त्यांचे स्थलांतर सुरु आहे.स्थानिक नागरिक अजूनही २०१३ व २०२१ मधील घटना विसरले नाही. २०१३ मध्ये केदारमाथमध्ये महापूर आला होता. त्यावेळी बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीत प्रचंड नुकसान झाले होते. ऋषिकेशमधील परमार्थ घाट पुर्ण नष्ट झाला होता. २०२१ मध्ये चमोलीत धोलीगंगा ग्लेशियर पडला होता. त्यावेळी प्रचंड नुकसान झाले होते.

प्रशासनाने दोन हॉटेल तोडण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान पावसाचे संकट आहे. यामुळे अनेक अडथळे निर्माण होऊ शकता. केंद्रीय सचिव अजय भल्ला यांनी सांगितले की, गृहमंत्रालयाने उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची एक टीम तयार केली आहे. ही टीम जोशीमठचा दौरा करणार आहे.

जोशीमठमध्ये का होतंय भुस्खलन
जोशीमठ ही परिस्थिती का निर्माण झाली आहे हा आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे. यासंदर्भात शास्त्रज्ञांचे स्वतःचे तर्क आहेत. यासंदर्भात चार प्रमुख संशोधन झाली आहे. ज्यात संशोधकांनी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी कारणे दिली आहेत.

नवीन शहर निर्माण करणार
टिहरीच्या धर्तीवर नवीन जोशीमठ करण्याचा सरकारचा विचार आहे. मात्र स्थानिक लोक त्यासाठी तयार नाहीत. त्यांना जोशीमठातच राहायचे आहे. मात्र, सरकारने जोशीमठची लोकसंख्या स्थलांतरित करण्यासाठी तीन ठिकाणांची निवड केली आहे.

चार धाम किंवा छोटा चार धाम म्हणजे काय
छोटा चारधाम किंवा चारधाम हे हिंदू धर्माच्या हिमालय पर्वतरांगांपैकी एक पवित्र मंदिर आहे. हे उत्तराखंड राज्यातील गढवाल विभागातील उत्तरकाशी, रुद्रप्रयाग आणि चमोली जिल्ह्यात वसलेले आहे आणि या मार्गावर बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री असे चार धाम आहेत. यापैकी बद्रीनाथ धाम ही भारताच्या चार धामपैकी सर्वात उत्तरी आहे. या चारही ठिकाणांची स्वतःची खासियत असली तरी चारधामच्या रूपाने ते एक युनिट म्हणून पाहिले जातात.