Maharashtra News Live : उद्धव ठाकरे यांना झोपेत सुद्धा एकनाथ शिंदे दिसतात – खासदार नरेश म्हस्के
देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. पुण्याच्या शिरूर तालुक्यात बिबट्याचा रस्त्यावर वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे. भक्ष्याच्या शोधात बिबटे लोकवस्तीत येत आहेत त्यामुळे बिबट्याचा मुक्तसंचार दिसत असून नागरिक दहशतीखाली आहेत. जालना जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून तापमानात घट होत असल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. दोन दिवसांपासून जालना शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात थंडीचा जोर अधिकच वाढल्यामुळे ग्रामीण भागात जागोजागी शेकोट्या पेटवून नागरिक थंडीपासून बचाव करताना दिसत आहेत. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
साताऱ्यात होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला अनेक दिग्गजांची हजेरी
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने साताऱ्यात होणाऱ्या 99 अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका जाहीर केली. 1 जानेवारी ते 4 जानेवारी 2026 दरम्यान साताऱ्यात होणाऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ख्यातनाम साहित्यिक विश्वास पाटील असणार आहे. दोन जानेवारीला ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत मृदुला गर्ग यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. ग्रंथ प्रदर्शनातूनच मुख्य ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ लेखक रघुवीर चौधरी यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही मुख्यमंत्री साहित्य संमेलनाला उपस्थितीत राहणार आहेत. शरद पवार यांनाही साहित्य संमेलनाचे आमंत्रण देण्यात आले आहे.
-
जामखेड : नृत्यांगना आत्महत्या प्रकरणी संदीप गायकवाडला चार दिवसांची पोलीस कोठडी
अहिल्यानगर जिल्ह्यांतील जामखेड येथे नृत्यांगना दिपाली पाटीलने आत्महत्या केली होती. या प्रकरणातील आरोपी संदीप गायकवाड याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नृत्यांगना दिपाली पाटील आत्महत्या प्रकरणी ताब्यात असलेल्या आरोपी संदीप गायकवाडला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. आता त्याला नऊ तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
-
-
उद्धव ठाकरे यांना झोपेत सुद्धा एकनाथ शिंदे दिसतात – खासदार नरेश म्हस्के
खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. खासदार म्हस्के म्हणालेकी, उद्धव ठाकरे यांना झोपेत सुद्धा एकनाथ शिंदे दिसत असतात. त्यांना झोप देखील येत नसेल असं मला वाटतं. उद्धव ठाकरे स्वतः हिरवा साप बनले आहे आणि स्वतः पक्ष गिळलेला आहे. त्यांनी कोणालाही ॲनाकोंडा बोलण्याची गरज नाही. स्वतःला हिरवा साप म्हणाव आणि त्यांचा स्वतःचा पक्ष गेलेला आहे, त्यांनी इतर पक्षाची काळजी करू नये.
-
छत्रपती संभाजीनगर : विनोद पाटील थोडक्यात बचावले
मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील हे एका आईस्क्रीम सेंटरच्या उद्घाटनाला गेले असता, त्याठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती. याच ठिकाणी गॅसचे फुगे घेऊन एक मुलगा उभा होता, फटाक्यांच्या आतिषबाजी मुळे अचानक फुगे पेटले. यावेळी विनोद पाटील हे थोडक्यात बचावले.
-
शिवसेनेच्या काळात मुंबईमधून मराठी माणूस हद्दपार – राधाकृष्ण विखे-पाटील
मीरा-भाईंदरमधील शाकाहारी मांसाहारी वादावर मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उद्धव ठाकरे सेनेवर टीका केली आहे. मुंबईमध्ये दुर्दैवाने मराठी माणसाच्या नावावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने नेहमीच राजकारण केले आहे.त्यांच्याच काळामध्ये मुंबईमधून मराठी माणूस हा हद्दपार झाला अशी टीका मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.
-
-
डीसीपी समीर शेख यांना तत्काळ सस्पेंड करावे – चंद्रकांत हंडोरे
महापरिनिर्वाण दिनानिमित्त जे वाहन मिळेल त्या वाहनांनी अनुयायी आले आहेत. चुनाभट्टी येथे रिक्षा अडवल्या आणि गाड्या अडविल्या, अनेक तास झाले ट्रॅफिक प्रचंड होती. पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यात एक महिला बेशुद्ध झाली आहे. पोलिसांनी त्यांना दवाखान्यात न्यायला हवं होते, ते झाल नाही. दरवर्षी जातात, यावर्षी काय झालं? या गोष्टीचा निषेध आहे, डीसीपी समीर शेख यांना तत्काळ सस्पेंड करावे अशी मागणी खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी केली आहे.
-
डोंबिवलीत बॅनरवरून पुन्हा एकदा भाजप- शिवसेनेत जुंपली
डोंबिवलीमध्ये बॅनरवरून पुन्हा एकदा भाजप शिवसेनेमध्ये जुंपली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यक्रमाच्या बॅनरवर शिवसेनेचा टीका करणारा बॅनर कोणी तरी काढला आहे. आता हा बॅनर काढला कोणी यावरुन दोघांत जुंपली आहे.
-
रत्नागिरीत ईव्हीएम मशीनसाठी कडक सुरक्षा व्यवस्था, कोणतीही चूक होऊ नये म्हणून खबरदारी
रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यातील चार नगरपरिषद आणि तीन नगरपंचायतीच्या ईव्हीएम मशीन कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आल्या आहेत. evm मशीन स्ट्रॉंग रूममध्ये दोन स्तरीय सुरक्षा व्यवस्थेमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील चार नगरपरिषद आणि तीन नगरपंचायतीच्या मतदानाच्या मतपेट्या आणखीन वीस दिवस राहणार सुरक्षा व्यवस्थेमध्ये ठेवण्यात आल्या आहेत.
-
सोलापुरात कंटेनरचा भीषण अपघात, वाहनाच्या लांबच लांब रांगा
सोलापूरमध्ये सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गांवर बोरामणी गावाजवळ कंटेनरला अपघात झाला आहे. या अपघातामुळे कंटेनर दुभाजकाच्या मधोमध अडकला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
-
अहिल्यानगरात डुकरांमध्ये आढळला आफ्रिकन स्वाइन फ्लू, सगळीकडे खळबळ
अहिल्यानगर : राहाता तालुक्यातील साकुरी गावात डुकरांमध्ये आफ्रिकन स्वाइन फ्लू आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे..जिल्हा पशुवैद्यकीय पथक साकुरी गावात दाखल झाले असून डुकरांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे..
-
अवैध वाळूचा हायवा पकडल्याने प्रभारी तहसीलदाराला तलाठ्याकडून मारहाण
अवैध वाळूचा हायवा पकडल्याने प्रभारी तहसीलदाराला तलाठ्याकडून मारहाण
अर्धापूरचे प्रभारी तहसीलदार राजेंद्र शिंदे यांना तलाठ्याकडून मारहाण
राजेंद्र शिंदे नायब तहसीलदार म्हणून अर्धापूर येथे कार्यरत
राजेंद्र शिंदे यांनी अर्धापूर पोलीस ठाण्यात दिली तलाठ्याविरुद्ध तक्रार
नांदेडच्या अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
अर्धापूर तालुक्यातील महादेव पिंपळगाव येथे कारवाई दरम्यान घडली घटना
-
कल्याण-डोंबिवलीमध्ये महानगरपालिकेच्या विकासकामांना वेग
कल्याण-डोंबिवलीमध्ये महानगरपालिकेच्या विकासकामांना वेग
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महत्त्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण
सावित्रीबाई फुले रंगमंदिर नूतनीकरण व वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलाचे उद्घाटन
भाजप व शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेशावरून वाद झाल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे व रवींद्र चव्हाण एकाच मंचावर
-
परतूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बागेश्वरी साखर कारखान्यावर मोर्चा
परतूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बागेश्वरी साखर कारखान्यावर मोर्चा
साखर कारखान्यावरील मोर्चाला राजू शेट्टी यांची उपस्थिती.
या वर्षीची पहिली उचल विना कपात एक रकमी 3 हजार 200 रुपये देण्याची मागणी
देवा भाऊ सगळे पक्ष चालवत असतील परंतु महाराष्ट्रातील जनता देवा भाऊंना मानत नाही, मंगल प्रभात लोढा यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजु शेट्टी यांचा टोला.
-
मुंबई विमानतळावरील इंडिगो काउंटरवर इंडिगोचे प्रवासी अजूनही रांगेत उभे
मुंबई विमानतळावरील इंडिगो काउंटरवर इंडिगोचे प्रवासी अजूनही रांगेत उभे
या प्रवाशांपैकी काहींना त्यांची तिकिटे परत करावी लागली, तर काहींना त्यांचे सामान अजून मिळालेच नाही.
इंडिगोची सेवा कोलमडल्यामुळे प्रवाशांना मोठा फटका
प्रवाशांना सहन करावा लागत आहे मोठा मनस्ताप
-
महायुतीच्या उमेदवारांच्या घरासमोरच चक्क करणी-भानामतीचा प्रकार
सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये आता निवडणुकीनंतर करणी भानामतीचा प्रकार समोर आला आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या घरासमोरच चक्क हा करणीचा प्रकार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका कागदात काळी बाहुली आणि करणीचे साहित्य गुंडाळून रात्रीच्या दरम्यान टाकण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.ईश्वरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीकडून कपिल ओसवाल व मन्सूर मोमीन हे उमेदवार असून ते राहत असलेल्या सावकार मशीद परिसरामध्ये त्यांच्या घरासमोर हा प्रकार घडला आहे.
-
स्मशानभूमीत सुविधांसाठी नागरिकांचे ‘चितेवर बसून’ अनोखे आंदोलन
जळगाव शहरातील मेहरूण स्मशानभूमीत सुविधांसाठी नागरिकांचे ‘चितेवर बसून’ अनोखे आंदोलन सुरु केले आहे. स्मशानभूमीत इलेक्ट्रीक शवदाहिनी, सभामंडप, सुरक्षा रक्षक यांसह अन्य सुविधा प्रलंबित असल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत.
-
“आज बाबासाहेब असते तर सुरू असलेल्या लोकशाहीचा धिकार केला असता”
आद 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो. त्यानिमित्ताने खासदरा मुकुल वासनिक यांनी स्पष्ट मत मांडलं. आज जर बाबासाहेब असते तर त्यांनी देशात अशा प्रकारच्या सुरू असलेल्या लोकशाहीचा धिकार केला असता असे वक्तव्य खासदार मुकुल वासनिक यांनी केले आहे.
-
सोन्याच्या दरात पाचशे रुपयांची वाढ
जळगावच्या सराफ बाजारामध्ये चांदीच्या आणि सोन्याच्या भावात पुन्हा वाढ झाल्याचे दिसते. सोन्याचे भाव 500 रुपयांनी वाढले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 86 हजार 430 रुपयांवर पोहोचले आहे.
-
आयरे गयरे नार नटरंगी-रुपाली ठोंबरे
२००५ पासून मी राजकारणात काम करत आहे आज-काल आलेले आयरे गयरे नार नटरंगी कोणी येऊन सल्ले देऊन जाणार अशा लोकांना सोशल मीडियाच्याच माध्यमातून उत्तर देणं गरजेचं असतं. नटरंगी नार म्हणत रूपाली ठोंबरे पाटील यांचा रूपाली चाकणकर यांना टोला लगावला. रूपाली ठोंबरे पाटलाचा अनुभव किती प्रदीर्घ आहे हीच आठवण करून दिली. नवीन आलेल्या नाकाने कांदा सोलणाऱ्यांनी लक्षात घ्यावं. त्याच्यासाठीच ही पोस्ट होती, असे रुपाली ठोंबरे पाटील यांनी स्पष्ट केले.
-
पूल दुरुस्तीसाठी आमदार प्रवीण स्वामी यांचे पाण्यात बसून आंदोलन
उमरगा तालुक्यातील मुंबई हैदराबाद महामार्गावरील कोरेगाव पुलाचे काम करण्याच्या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार प्रवीण स्वामी यांनी पाण्यात बसून आंदोलन सुरू केले. गेली आठ महिन्यापासून फुलाच्या खाली पाणी साठुन राहत असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या ग्रामस्थांची गैरसोय होत असल्याचे ते म्हणाले. जोपर्यंत महामार्ग अधिकाऱ्याकडून काम सुरु करण्यात येणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा आमदार प्रवीण स्वामी यांनी दिला.
-
आंबेडकर अनुयायांचा स्तुत्य उपक्रम
छत्रपती संभाजीनगर मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना फुले व पुष्प अर्पण केले, तर या ठिकाणी एका सामाजिक संस्थेच्या वतीने फुले वाहन्या ऐवजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्यांकडून एक पेन व एक वही घेऊन, या वह्या आणि पेन देण्याचा उपक्रम राबविला, या वह्या आणि पेन जिजाऊ जयंती सावित्रीबाई फुले जयंती छत्रपती शाहू महाराज जयंती या दिवशी विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहेत.
-
मत चोरी ही सर्वात मोठी चोरी-अंबादास दानवे
मत चोरी ही देशातील सर्वात मोठी चोरीची घटना आहे. लोकशाहीत सर्वात मोठा अधिकार मतदानाचा आहे,आणि तोच चोरी होत असेल तर आवाज उठवावा लागेल. कुणीही आवाज उठवला तर त्यामागे सहभागी होणे गरजेचे आहे, असे उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे म्हणाले.
-
पुस्तकांची मोठी विक्री
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 वा महापरिनिर्वाण दिन आहे या दिनानिमित्त संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज पार परिसरामध्ये त्यांच्या विचारांच्या साहित्याचं वाटप आणि विक्री केली जाते..डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे साहित्य महाराष्ट्र राज्य मुद्रांक आणि प्रकाशन विभागाकडून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलेला आहे दहा टक्के कमी दरामध्ये याची विक्री सध्या सुरू आहे आणि याला विकत घेण्यासाठी बरेचशे अनुयायी पोहचत आहेत
-
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत-शरद पवार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत असे शरद पवार यांनी जाहीर केल्याची माहिती प्रशांत जगताप यांनी दिली. त्यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना फोनवरून ही माहिती कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती जगताप यांनी दिली.
-
मला लाज वाटते की सरकारने झाडांवर फुल्या मारल्या – अमेय खोपकर
मला लाज वाटते की सरकारने झाडांवर फुल्या मारल्या आहेत. मुख्यमंत्री यांनी जसे पार्थ पवारांना माफ केले तसे या झाडांना माफ करावे… मनसे या एकही झाडाला हात लावू देणार नाही… गिरीश महाजन यांच्यावर आमचा विश्वास नाही… कालही ते खोटे बोलले की हैदराबादला गेलो होतो वगैरे… खासगी बिल्डरच्या घशात देण्याचा हा घाट आहे… असं वक्तव्य अमेय खोपकर यांनी केलं आहे.
-
शौर्य दिनानिमित्त भाजपकडून हनुमान आरती
आज सहा डिसेंबर आणि या; दिवशी आयोध्ये मधील वादग्रस्त ( बाबरी ढाचा )पाडला होता आणि त्या निमित्ताने भाजपाच्या वतीने आज शौर्य दिवस साजरा करण्यात येत आहे. भाजपच्या वतीने औरंगपुरातील दक्षिणमुखी महादेव मंदिरात आरती करण्यात येत आहे. यावेळी मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, आमदार संजय केनेकर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे या आरतीला उपस्थित आहेत.
-
मुंबई – नागपूर समृध्दी महामार्ग आज पूर्णपणे सुसाट!
समृध्दी महामार्गावरील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी अचानक कामबंद आंदोलन सुरू केल्याने महामार्गावर टोल वसुली बंद झाली आहे. मुंबईहून सुरू होणाऱ्या मार्गाचा प्रथम व नागपूरहून येणाऱ्या मार्गाचा शेवटचा टोल असलेला निंबवली पथकर टोल नाका आहे. येथेही एकही कर्मचारी उपस्थित नसल्याने टोल पूर्णपणे खुला झाला आहे. कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा पगारवाढीची मागणी लेखी स्वरूपात केल्याचे सांगितले असून, व्यवस्थापनाकडून कोणतीही दखल न घेतल्यामुळे आज सकाळी ८ वाजेपासून अचानक कामबंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महामार्गावरून जाणाऱ्या सर्व वाहनांना आज टोलमुक्त प्रवासाचा लाभ मिळत आहे.
-
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने बाईक व कार अभिवादन रॅली
अमरावती : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने बाईक व कार अभिवादन रॅलीचं आयोजन करण्यात आलं. अभिवादन रॅलीत काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक काँग्रेसने नेत्या यशोमती ठाकूर सहभागी होत्या… महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना आज अभिवादन केले जाणार आहे.
-
तपोवन साधुग्राम परिसरातील साफ सफाईला सुरुवात
साधू ग्राम परिसरातील केर कचरा उचलण्यास सुरुवात. नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर राडा रोडा उचलण्यास सुरुवात नागरिकांच्या तक्रारी नंतर महापालिकेला आली जाग
-
28 डिसेंबर पासून तुळजाभवानीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाचे आयोजन
3 जानेवारी पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने शाकंभरी महोत्सव होणार साजरा. यावर्षी शाकंभरी महोत्सवात तुळजापूर शहरातील कागदे कुटुंबाला मिळाला यजमान पदाचा मान. उल्हास कागदे आणि वैशाली कागदे यांना मिळाला शाकंभरी नवरात्र महोत्सवात यजमान पदाचा मान. शारदीय नवरात्री महोत्सवा नंतर शाकंभरी वर्षभरातील सर्वात मोठा महोत्सव
-
मीरा-भाईंदरमध्ये एमबीएमसीच्या 12 नंबर बसमध्ये धक्कादायक प्रकार
मीरा-भाईंदरमध्ये आज सकाळी 8.40 वाजता एमबीएमसीच्या 12 नंबर बसमध्ये प्रवाशांचा जीव थरकाप उडवणारी घटना घडली आहे. बसच्या फायरच्या बाटलीवर एका प्रवाशाचा पाय नकळत नोकवर पडला आणि बाटली सील नसल्याने प्रेशर तयार होऊन अचानक धूर बाहेर आला. क्षणात बसमध्ये घनदाट धूर पसरल्याने प्रवाशांची एकच धावपळ झाली. धक्कादायक म्हणजे ही फायर बाटली डेपोतून सुटण्यापूर्वी चेकच का झाली नाही, यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
-
अहिल्यानगरच्या जामखेड नृत्यांगना दिपाली पाटील आत्महत्या एकाला अटक
संदीप गायकवाड असं अटक केलेल्या आरोपीचे नाव. काल रात्री जामखेड पोलिसांनी केलं संदीप गायकवाड याला अटक. दीपाली पाटील हिला संदीप गायकवाड हा लग्नाचा तगादा लावत असल्यानेच तिने आत्महत्या केल्याचा तिच्या नातेवाईकांचा आरोप आहे…
-
इंडिगोवर सरकारने कारवाई केली पाहिजे- सुप्रिया सुळे
इंडिगोच्या मुद्द्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी नुकताच मोठे विधान केले. सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, सरकारने इंडिगोवार कारवाई केलीच पाहिजे. इंडिगोला नक्की काय झालं हे कळत नाहीये.
-
अहिल्यानगर – नृत्यांगना दिपाली पाटील आत्महत्या प्रकरणी एकाला अटक
जामखेड – अहिल्यानगरच्या जामखेड नृत्यांगना दिपाली पाटील आत्महत्येने मोठी खळबळ माजली असून याप्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे. काल रात्री जामखेड पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली.
-
धाराशिव जिल्ह्यातील आधारभूत किंमत हमीभाव केंद्रे बारदाना नसल्याने पाच दिवसापासून बंद
धाराशिव जिल्ह्यातील आधारभूत किंमत हमीभाव केंद्रे बारदाना नसल्याने गेल्या पाच दिवसापासून बंद आहेत. जिल्ह्यात नाफेड आणि पणन मंडळाकडून 51 सोयाबीन हमीभाव केंद्रं सुरू करण्यात आली आहेत. पण 2 डिसेंबर पासून बारदान नसल्याने ही हमीभाव केंद्र ओस पडली आहेत. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभाव मिळावा या उद्देशाने सुरू केलेले हमीभाव केंद्रे बारदान अभावी बंद आहेत. शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना कमी भावात सोयाबीन विकण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय .
-
इंडिगो एअरलाइन्स विमान रद्द प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणीची मागणी
इंडिगो एअरलाइन्स विमान रद्द प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणीची मागणी करण्यात आली आहे. अडचणीच्या परिस्थिती सरकारकडे कोणते पर्याय आहेत, अशी विचारणा या याचिकेतून करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाकडून समन्स बाजवण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
-
शासनाचा थकीत दंड न भरल्यामुळे अंबडच्या तहसीलदारांकडून वाळू माफियांवर कारवाई, 30 लाखांचा दंड
जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यात अवैध वाळू वाहतूक प्रकरणी न्यायालयातून सुटलेली 2 वाहने तहसीलदार विजय चव्हाण यांच्या नेतृत्वात महसूल विभागाने ताब्यात घेत पुन्हा जप्त केली. वाळू माफियांवर मागच्या काही दिवसापासून कडक कारवाई केली जात आहे. 30 लाखांचा थकीत असलेला दंड न भरल्यामुळे कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील विषमता दूर केली – देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाज जागृत केला, समाजातील विषमता दूर केली, सर्वांना संधीची समानत दिला, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
Published On - Dec 06,2025 8:49 AM
