वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी महोत्सवाला पैठण, छत्रपती संभाजीनगर येथे सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी गोदावरी नदी पात्रात दाखल झाले असून, नदीतील पाणी कमी करून तात्पुरता निवारा उभारला आहे. उत्साहाच्या वातावरणात वारकरी एकनाथ महाराजांच्या समाधी दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. हा महोत्सव पुढील तीन दिवस चालणार आहे.
संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी महोत्सवाला आज सकाळी पैठण, छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक या पवित्र सोहळ्यासाठी पैठण नगरीत दाखल झाले आहेत. वारकऱ्यांच्या सोयीसाठी गोदावरी नदीतील पाणी कमी करण्यात आले असून, अनेकांनी नदीच्या पात्रात तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली आहे.
नाथषष्ठीच्या निमित्ताने गोदावरी नदीच्या पात्रातून संत एकनाथ महाराजांच्या समाधी दर्शनासाठी वारकऱ्यांची मोठी रांग लागलेली दिसत आहे. या सोहळ्यात महिला वारकऱ्यांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन, तर पुरुष वारकऱ्यांच्या हातात भगवा ध्वज लक्ष वेधून घेत आहे. शासकीय महापूजेनंतर सुरू झालेला हा महोत्सव पुढील तीन दिवस चालणार आहे. प्रशासनाने या महोत्सवासाठी जय्यत तयारी केली असून, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्यभरातून आलेल्या 765 हून अधिक दिंड्या या उत्सवात सहभागी झाल्या आहेत, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणाने भारून गेला आहे.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

