सर्व हिंदूंना देवाची चर्चा करण्याचा अधिकार, काशी विद्वत्परिषदेने इटावाच्या घटनेचा नोंदवला निषेध

सनातन परंपरेत सर्व लोकांना आदर आणि सन्मान मिळाला आहे आणि सर्व हिंदूंना भागवतांवर चर्चा करण्याचा किंवा देवाची चर्चा करण्याचा अधिकार असल्याचे, असे काशी विद्वत परिषदेने म्हटले आहे. कोणत्याही व्यक्तीला कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. इटावाची घटना निषेधार्ह असल्याचेही त्यांनी नमूद केलं.

सर्व हिंदूंना देवाची चर्चा करण्याचा अधिकार,  काशी विद्वत्परिषदेने इटावाच्या घटनेचा नोंदवला निषेध
काशी विद्वत्परिषदेकडून इटावाच्या घटनेचा निषेध
Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Jun 26, 2025 | 8:47 AM

इटावा येथे कथावाचकासोबत घडलेल्या घटनेमुळे खळबळ माजली आहे. याचदरम्यान काशी विद्वत्परिषदेने इटावातील या घटनेची कडक शब्दांत निंदा केली आहे. या घटनेसंदर्भात पद्मभूषण प्राध्यापक वशिष्ठ त्रिपाठी (अध्यक्ष काशी विद्वत परिषद) यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. इटावा येथे कथाकारासोबत घडलेली घटना पहिल्या दृष्टीक्षेपातच निंदनीय असल्याचे या बैठकीत एकमताने म्हटले गेले. कोणत्याही व्यक्तीला कायदा हातात घेण्याचा अधिकार नसल्याचे बैठकीत नमूद करण्यात आलं.

काशी विद्वत परिषदेचे सरचिटणीस प्राध्यापक रामनारायण द्विवेदी म्हणाले की, आपल्या सनातन परंपरेत, अनेक ब्राह्मणेतर लोक आहेत ज्यांना ऋषींच्या बरोबरीचे मानले गेले आहे. मग ते महर्षी वाल्मिकी असोत, वेद व्यास असोत, रविदास असोत किंवा रायदास असोत. सनातन परंपरेत सर्व लोकांना आदर आणि सन्मान मिळाला आहे आणि सर्व हिंदूंना भागवतावर चर्चा करण्याचा किंवा देवावर चर्चा करण्याचा अधिकार आहे.

कोणालाही अशा प्रकारे रोखता येणार नाही

ते म्हणाले की, अशाप्रकारे कोणालाही रोखता येणार नाही. काही तथाकथित व्यास लोकांनी हिंदू असूनही वेळोवेळी व्यासपीठाला कलंकित करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामुळे व्यासपीठ कुप्रसिद्ध झाले आहे हे देखील दुःखद आहे. कोणत्याही व्यासांना काहीही नाकारण्याचा अधिकार नाही कारण जेव्हा आपण भक्ताच्या घरी व्यासपीठावर बसतो तेव्हा आपण श्रद्धेचा विश्वासघात करू शकत नाही. कारण विश्वास हात भक्ती आणि श्रद्धेचे कारण असतो. आपण हिंदूंनी आपापसात या विषयावर चर्चा केली पाहिजे आणि आपण आपली ओळख लपवू नये.

समाजाला विभागण्याचे काम होऊ नये

प्रोफेसर रामनारायण द्विवेदी म्हणाले की, आपल्या सनातन धर्मात सर्वांना समान आदर आहे, जर आपण व्यासपीठावर आहोत आणि देवाची कथा सांगत आहोत, तर आपण खोटेपणा टाळला पाहिजे. पण ज्या प्रकारे कायद्याचे उल्लंघन केले गेले आहे, ते जर सत्य असेल तर प्रशासनाने घटनात्मक पद्धतीने कारवाई करावी आणि निष्पक्ष चौकशी करावी. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी. समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होऊ नये असं त्यांनी नमूद केलं. आपल्या सनातन हिंदू समाजात यदुवंशींना खूप आदरणीय स्थान आहे. काही लोक राजकीय फायद्यासाठी हिंदूंचे आपापसांत भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र हिंदूंनी आपापसात हे समजून घेतले पाहिजे, जेणेकरून (भविष्यात) अशा चुका पुन्हा होणार नाहीत.

हिंदू समाजात असभ्य वर्तन करण्याची परंपरा नाही

हिंदू समाजात कोणाचाही अपमान करण्याची किंवा असभ्य वर्तन करण्याची परंपरा नाही आणि कोणत्याही विशिष्ट जातीला सामूहिक शिव्या वगैरे दिल्या जाऊ नयेतये, असे ते पुढे म्हणाले. जर एखाद्या व्यक्तीने कोणत्याही स्वरूपात चूक केली असेल तर त्याने भारतीय संविधानावर विश्वास ठेवला पाहिजे आणि संविधानाच्या कक्षेत राहून कायदेशीर कारवाईल होईल यावर विश्वास ठेवला पाहिजे.

या कृत्याचा आम्ही काशी विद्वत परिषदेच्या वतीने निषेध करतो. आणि आम्ही हिंदू सनातन धर्माच्या अनुयायांना जातीभेदाच्या पलीकडे जाऊन सद्भावना आणि सौहार्दाच्या वातावरणात आध्यात्मिक आणि राष्ट्रीय जाणीव विकसित करण्याचे आवाहन करतो. ज्यामुळे आपल्या राष्ट्राला जागतिक नेतेपदाचे स्थान मिळावे. आपल्या शास्त्रांमध्ये द्वेष, शत्रुत्व, मत्सर, भेदभाव यांना स्थान नाही.

या बैठकीत प्राध्यापक राम किशोर त्रिपाठी, प्राध्यापक रमाकांत पांडे, प्राध्यापक विनय कुमार पांडे, प्राध्यापक हर प्रसाद दीक्षित, डॉक्टर दिव्या चैतन्य ब्रह्मचारी, प्राध्यापक विवेक कुमार पांडे आदी विद्वान उपस्थित होते.

काय आहे प्रकरण ?

उत्तर प्रदेशातील इटावातील दादरपुर गावात एक कथावाचक आणि त्याचे साथीदार कथा वाचनासाठी गेले होते. मात्र 22 जूनच्या रात्री काही लोकांनी त्यांना मारहाण केली असा आरोप करण्यात आला. केवळ मागासवर्गीय असल्यामुळे कथाकाराचा आणि त्याच्या सहकाऱ्यांचा अपमान करण्यात आल्याचा दावाही केला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता. याप्रकरणी 4 लोकांना अटकही करण्यात आली होती. मात्र त्यात आता नवा ट्विस्ट आला आहे.

महिलांशी गैरवर्तन केल्यामुळे कथाकारांना मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे इटावा येथे यादव कथाकारांनाअमानुष वागणूक आणि हल्ला केल्याचं हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होताना दिसत आहे. मंगळवारी ब्राह्मण महासभेने दोन्ही कथावाचकांविरुद्ध मोर्चा उघडला आणि त्यांना आरोपी बनवण्याची मागणी केली. खरंतर, कथावाचकांनी महिलांशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप आहे. तथापि, या प्रकरणात कोणतीही लेखी तक्रार देण्यात आलेली नाही.

महासभेचे राज्याध्यक्ष अरुण दुबे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने वरिष्ठ पोलिस अधीक्षक ब्रिजेश कुमार श्रीवास्तव यांची भेट घेतली आणि कथाकार आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध तक्रार सादर केली. कथाकारांनी त्यांची जात लपवली, धार्मिक भावना भडकावल्या आणि महिलांशी असभ्य वर्तन केले, असा आरोप महासभेने केला आहे. जर लवकरच योग्य कारवाई केली नाही तर आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.