कन्नडिगांचा थयथयाट सुरूच, मध्यवर्ती म.ए. समितीच्या नेत्यांना केली अटक…

| Updated on: Dec 06, 2022 | 5:43 PM

बेळगावमध्ये 144 कलम लागू असताना अशाप्रकारे निवेदन देण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने जमणे चुकीचे असल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर सर्व नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

कन्नडिगांचा थयथयाट सुरूच, मध्यवर्ती म.ए. समितीच्या नेत्यांना केली अटक...
Follow us on

बेळगावः महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा दोन्ही राज्यात प्रचंड तापला आहे. त्यामुळे आता दोन्ही राज्यातून जोरदार आंदोलनं करण्यात येत आहे. तर दुसरीकडे कर्नाटकात असणाऱ्या मराठी भाषिकांवर आता कर्नाटक सरकारकडून अन्याय अत्याचार करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद वाढल्यानंतर त्याच्यावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातील समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई कर्नाटकात जाणार होते. मात्र मंत्र्यावर कर्नाटकात प्रवेशबंदी घालण्यात आली. त्यानंतर बेळगावमध्ये 144 कलम लागू करून जमावबंदीचे आदेश देण्यात आले.

बेळगाव आणि सीमाभागात 144 कलम लागू करण्यात आल्यानंतर मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी
आमच्या नेत्यांची अडवणूक करू नका. या मागणीचे निवेदन बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यासा्ठी गेलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बेळगावमध्ये 144 कलम लागू असताना अशाप्रकारे निवेदन देण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने जमणे चुकीचे असल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर सर्व नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

यामध्ये मध्यवर्ती म. ए. समितीचे प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, मनोहर किणेकर, युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, शिवाजी सुंठकर, आर. एम. चौगुले, सरस्वती पाटील, आर. आय. पाटील, भागोजी पाटील, शिवाजी मंडोळकर, मनोज पावशे, प्रवीण रेडेकर, ऍडव्होकेट एम जे पाटील, मोतेश बार्देशकर, अमर यळ्ळूरकर, सुधीर चव्हाण, चंद्रकांत कोंडुस्कर यांचा समावेश आहे.

मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेत्यांना अटक करण्यात आल्याने सीमाभागात आता हे वातावरण तापले आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारवर घटनाबाह्य वागत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.