अंगाला लग्नाची हळद लागताच क्षणात तिचं शरीर..ज्या दिवशी निघणार होती डोली, त्याच दिवशी निघाली तिची अंत्ययात्रा, सगळेच शॉकमध्ये

नवरा दिगंबर नाथ दुसर्‍या गावात होता. त्याला मुलीच्या घरातील उष्टी हळद लागली नव्हती. म्हणून तो वाचला. 26 एप्रिलला राखीची डोली उठणार होती. सात फेरे घेऊन ती नवीन घरात जाणार होती.

अंगाला लग्नाची हळद लागताच क्षणात तिचं शरीर..ज्या दिवशी निघणार होती डोली, त्याच दिवशी निघाली तिची अंत्ययात्रा, सगळेच शॉकमध्ये
Rakhi Turmeric ritual reaction
| Updated on: May 15, 2026 | 9:11 AM

घरात लग्नाचा आनंद, उत्साह होता. नातेवाईक, पाहुणे मंडळी घरी आलेली. लग्नाची तयारी जोरात सुरु होती. गजु नाथचं घर आनंदाने भरलेलं. मोठी मुलगी राखीचं लग्न होणार होतं. ती 22 वर्षांची होती. वेळेत लग्न होत असल्याने सर्व कुटुंबीय आनंदात होते. 24 एप्रिलला हळदी सोहळ्याच्या वेळी राखी खूप आनंदात होती. ढोलकीच्या थापेवर तिचा डान्स सुरु होता. तेव्हा कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल की, हा आनंद फक्त काही तासांचा आहे. मध्य प्रदेशच्या खरगोन जिल्ह्यातील कसरावद नगरची ही घटना आहे. राखीचं लग्न खामखेडा येथे राहणाऱ्या दिगंबर नाथ बरोबर ठरलेलं. 24 एप्रिलच्य संध्याकाळी राखीला जशी हळद लावली. लगेच तिला रिएक्शन सुरु झालं. अगदी काही वेळातच राखीचा गळा, ओठ सुजले. तिचा आवाज बंद झाला, असं नातेवाईकांनी सांगितलं.

आई-वडिल या प्रकाराने घाबरले. काय होतय हेच त्यांना कळत नव्हतं. घाबरलेले नातेवाईक राखीला जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. तिला लगेच इंदूर येथे घेऊन जाण्यास सांगितलं. जिल्हा रुग्णालयाने रुग्णवाहिका सुद्धा दिली नाही असा राखीच्या नातेवाईकांचा आरोप आहे. त्यानंतर वडिलांनी पदरचे 4000 रुपये खर्च केले व तिला खासगी रुग्णवाहिकेने इंदूरच्या MYH रुग्णालयात घेऊन गेले.

वाटेतच राखीने प्राण सोडले

25 एप्रिलला MYH रुग्णालयात उपचार सुरु असताना गजु नाथ यांनी मुलीचं लग्न असल्याचं सांगितलं. त्यांनी मुलीला प्रायवेट रुग्णालयात नेण्याची इच्छा व्यक्त केली. राखीला खासगी रुग्णालयात नेलं. तिथे उपचाराचा खर्च 2 ते 3 लाख रुपये असल्याचं सांगितलं.आर्थिक दृष्ट्‍या तितकी ताकद नसल्याने ते मुलीला पुन्हा सरकारी रुग्णालयात घेऊन येते होते. वाटेतच राखीने प्राण सोडले.

ती खूप आनंदात होती, नाचत होती

मुलीचे वडिल गजु भाई बोलले की, “हळदी विकायला आलेल्या माणसाकडून आम्ही हळद घेतली. जवळपास 10-15 जणांनी माझ्या राखीला हळद लावली. पण तिला रिएक्शन झालं. ती खूप आनंदात होती. नाचत होती. माझ्या वाट्याला जे दु:ख आलं, ते दुसऱ्या कुठल्या कुटुंबाच्या वाट्याला येऊ नये”

म्हणून तो वाचला

26 एप्रिलला राखीची डोली उठणार होती. सात फेरे घेऊन ती नवीन घरात जाणार होती. त्याच दिवशी वडिलांना तिची अर्थी उचलावी लागली. नवरा दिगंबर नाथ दुसर्‍या गावात होता. त्याला मुलीच्या घरातील उष्टी हळद लागली नव्हती. म्हणून तो वाचला. राखीच्या कुटुंबातील तिची आई सीताबाई, भाऊ लवकुश आणि दोन लहान बहि‍णींची रडून रडून वाईट अवस्था आहे.

Follow Us