मोठी बातमी! पाकिस्तान हादरलं, भारताच्या सर्वात मोठ्या शत्रूची पाकमध्ये हत्या, समोरून आले अन् धड धड गोळ्या झाडल्या..

पाकिस्तानातून मोठी बातमी समोर येत आहे, पाकिस्तान हादरलं आहे. पाकिस्तानमध्ये मोस्ट वॉटेंड दहशतवाद्याची हत्या करण्यात आली आहे. अज्ञाताकडून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे.

मोठी बातमी! पाकिस्तान हादरलं, भारताच्या सर्वात मोठ्या शत्रूची पाकमध्ये हत्या, समोरून आले अन् धड धड गोळ्या झाडल्या..
पाकिस्तानमध्ये मोस्ट वॉटेंड दहशतवाद्याची हत्या
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 15, 2026 | 6:33 PM

पाकिस्तानातून मोठी बातमी समोर येत आहे. भारताचा मोस्ट वॉटेंड दहशतवादी मोहम्मद कासिम गुज्जर याची अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळी मारून हत्या केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार जेव्हा मोहम्मद गुज्जर याची हत्या करण्यात आली तेव्हा तो आपल्या बाईकवर बसून कुठेतरी जात होता, याचवेळी त्याच्यावर गोळीबार करण्यात आला, या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे. कासिम गुज्जर हा मुळ जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्याचा रहिवासी होता, तो लष्कर-ए तैयबा या संघटनेचा दहशतवादी होता. तो गेल्या अनेक दिवसांपासून पाक व्याप्त काश्मीरमध्ये लपून बसला होता, मात्र आज त्याची पेशावरमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. या वृत्ताला अद्यापपर्यंत कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही, मात्र त्याच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

कोण आहे मोहम्मद कासिम गुज्जर?

भारत सरकारकडून मार्च 2024 मध्ये अनेक दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाइंड असलेल्या मोहम्मद कासिम गुज्जर उर्फ सलमान उर्फ सुलेमान याला यूएपीए अंतर्गत दहशतवादी घोषित करण्यात आलं होतं. या संदर्भात भारताच्या गृह मंत्रालयानं ट्विट करत माहिती दिली होती. लष्कर ए तैबासाठी काम करणारा मोहम्मद कासिम गुज्जर हा अनेक दहशतवादी हल्ल्यांसाठी जबाबदार आहे, या दहशतवादी हल्ल्यांमध्ये अनेकांनी आपला जीव गमावला आहे, भारताविरोधात कट कारस्थानामध्ये त्याचा सहभाग आहे. भारताच्या अखंडतेला आणि एकतेला जर कोणी धोका निर्माण करत असेल तर त्याला सोडणार नाही, असं ट्विट करण्यात आलं होतं.

अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग

पीआयबीच्या एका रिपोर्टनुसार मोहम्मद कासिम गुज्जर हा जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातल्या अंगराल्ला गावचा रहिवासी होता. त्याचा अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग आहे. तो पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर ए तैबासाठी काम करत होता. भारतामध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी प्रयत्न, दहशतवादी हल्ल्यांची योजना बनवणे तसेच शस्त्रांची तस्करी असे त्यावर भारतामध्ये आरोप होते, अखेर त्याची हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे, त्याच्यावर अज्ञाताने गोळ्या झाडल्या आहेत.