माझे कर्मचारीच मला सहज लक्ष्य करतायेत, एका वर्षात चारदा बदली झालेल्या IAS नेहा मारव्या सिंह यांचं पत्र

आयएस अधिकारी नेहा मारव्या सिंह या चांगल्याच चर्चेमध्ये आल्या आहेत. एकाच वर्षामध्ये त्यांच्या चार बदल्या झाल्या आहेत. त्यानंतर आता त्यांनी 'इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस' (IAS) असोसिएशनला पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.

माझे कर्मचारीच मला सहज लक्ष्य करतायेत, एका वर्षात चारदा बदली झालेल्या IAS नेहा मारव्या सिंह यांचं पत्र
IAS officer Neha Marvya Singh
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 07, 2026 | 10:23 PM

आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. एफडीएच्या आयुक्तपदाची सूत्रं स्विकारल्यापासून त्यांनी महाराष्ट्रात कारवाईचा धडका लावला आहे. मात्र ते आणखी एका कारणासाठी देखील चर्चेत आहेत. त्यांच्या 21 वर्षांच्या प्रशासकीय कारकि‍र्दीमध्ये त्यांची तब्बल 25 वेळा बदली झाली आहे. दरम्यान आणखी एक आयएस अधिकारी नेहा मारव्या सिंह या देखील याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांची एका वर्षात तब्बल चौथ्यांदा बदली करण्यात आली आहे. मारव्या सिंह या मध्य प्रदेश कॅडरच्या आयएएस अधिकारी आहेत. शनिवारी त्यांची एका वर्षात चौथ्यांदा बदली करण्यात आली.

त्यानंतर त्यांनी या पार्श्वभूमीवर ‘इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस’ (IAS) असोसिएशनला पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. मला माझ्या हाताखालचे कर्मचारी सहज लक्ष्य करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. माझी एका वर्षात चारदा बदली झाली, प्रत्येक विभागात दोन ते तीन महिन्याचा कार्यकाळ मिळाला. मग अशा स्थितीमध्ये काम कसं करायचं असा सवाल या पत्राद्वारे नेहा मारव्या सिंह यांनी केला आहे. मारव्या सिंह यांनी आदिवासी क्षेत्र विकास प्रकल्पाच्या संचालकपदाचा कार्यभार स्विकारला होता, त्यानंतर त्यांची आता दोनच महिन्यात बदली करण्यात आली.

कर्मचाऱ्यांनी त्यांच्याविरोधात ‘पेन डाऊन’ आंदोलन सुरू केलं होतं, त्यानंतर त्यांची काही दिवसातच बदली करण्यात आली. यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी या पार्श्वभूमीवर ‘इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस’ (IAS) असोसिएशनला पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. मला माझ्या हाताखालचे कर्मचारी सहज लक्ष्य करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच दोन ते तीन महिन्याच्या एवढ्या कमी कालावधीत काम कसं करायचं? असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे.

एक आयएसएस अधिकारी एवढा असुरक्षित कसा असू शकतो? की त्याच्या हाताखलचेच लोक त्याच्या बदल्या करतात. मी असं काय केलं की माझ्या एका वर्षात चार बदल्या झाल्या? असा सवालही त्यांनी आपल्या या पत्रामधून उपस्थित केला आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us