Farmers Protest : सरकारसोबतची 9 वी बैठकही निष्फळ, पुढची बैठक कधी?

| Updated on: Jan 15, 2021 | 6:34 PM

मोदी सरकारच्या नव्या 3 कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांची 9 वी बैठकही निष्फळ ठरलीय.

Farmers Protest : सरकारसोबतची 9 वी बैठकही निष्फळ, पुढची बैठक कधी?
Follow us on

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या नव्या 3 कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांची 9 वी बैठकही निष्फळ ठरलीय. बैठकीत कृषी कायद्यावर तोडगा निघाला नाही. शेतकऱ्यांनी तिन्ही कायदे रद्द झाल्याशिवाय आंदोलनामधून माघार नाही, अशी ठाम भूमिका घेतलेली आहे. तर दुसरीकडे सरकारही मागे हटण्यास तयार नसल्याचं दिसतंय. त्यामुळे हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. आता शेतकरी आणि केंद्र सरकारमधील पुढील बैठक 19 जानेवारीला दुपारी 12 वाजता होणार आहे (No solution in meeting between Farmers and Government over Farm Laws).

केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांची 9 वी बैठकही झाली. मात्र, ही बैठकही कोणत्याही तोडग्याविनाच संपली. मात्र, शेतकरी आपल्या भूमिकेवर अगदी ठाम आहेत. “सरकार आम्हाला थकवण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही थकणार नाही. सरकारने तोडगा काढत कृषी कायदे रद्द न केल्यास हे शेतकरी आंदोलन 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ सुरु राहिल,” असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय.

शेतकरी आंदोलनाचा आज (15 जानेवारी) 51 वा दिवस आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात पंजाबमधील राज भवनाकडे जाणाऱ्या काँग्रेसच्या मार्चवर पोलिसांनी कारवाई केली. काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या फवाऱ्याचा उपयोग केला. यावेळी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यातही घेण्यात आले.

संबंधित बातम्या :

Farmers Protest | काँग्रेसचा देशभरात ‘शेतकरी अधिकार दिवस’, राजभवन आणि LG ना घेराव घालणार

हरियाणातील भाजप सरकार संकटात?, जेजेपीचे आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत?

चार सदस्यांची कमिटी शेतकरी आंदोलन थांबवण्यासाठी केलेला फार्स ठरु नये: सतेज पाटील

व्हिडीओ पाहा :