AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चार सदस्यांची कमिटी शेतकरी आंदोलन थांबवण्यासाठी केलेला फार्स ठरु नये: सतेज पाटील

सुप्रीम कोर्टानं कृषी कायद्यांच्या अमंलबजावणीला स्थगिती दिली असली तरी लढाई संपली नाही, असं सतेज पाटील म्हणाले. (Satej Patil Farmer Protest)

चार सदस्यांची कमिटी शेतकरी आंदोलन थांबवण्यासाठी केलेला फार्स ठरु नये: सतेज पाटील
सतेज पाटील, गृहराज्यमंत्री
| Updated on: Jan 12, 2021 | 8:16 PM
Share

मुंबई: सुप्रीम कोर्टानं कृषी कायद्यांच्या अमंलबजावणीला स्थगिती देण्याच्या निर्णय घेतला आहे. मात्र, लढाई अजून संपलेली नाही, असं ट्विट काँग्रेस नेते गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे. कृषी कायद्यांच्या बाजूनं लिहिणाऱ्यां बोलणाऱ्यांच्या समितीमधील समावेशाबद्दल सतेज पाटील यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. (Satej Patil said struggle of farmer protest not end after Supreme Court decision)

केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यानंतर शेतकरी आणि राजकीय पक्षांनी स्वागत केलं आहे. मात्र, शेतकरी संघटनांनी कायदे रद्द करण्याची भूमिका कायम ठेवली आहे. सतेज पाटील यांनी ट्विट करत कृषी कायद्यांविरोधातील लढाई संपली नसल्याचं म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टानं बनवलेल्या समितीमधील चार सदस्य कृषी कायद्यांच्या बाजूनं बोलणारे किंवा लिहिणारे आहेत.

दिवसभराची बित्तंबात, पाहा आजची बात, #TV9Marathi वर दररोज रात्री 10 वा

तीन कृषी कायद्यांच्या बाजूने बोलणाऱ्या किंवा लिहिणाऱ्या या चार सदस्यांचा समावेश असणारी ही कमिटी आंदोलन थांबविण्यासाठी केलेला फक्त एक फार्स ठरू नये, अशी अपेक्षा सतेज पाटील यांनी व्यक्त केली आहे. सतेज पाटील यांनी या “कमिटीने शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करून या निर्दयी मोदी सरकारला हे काळे कायदे रद्द करायला लावावेत.”अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. (Satej Patil said struggle of farmer protest not end after Supreme Court decision)

सतेज पाटील यांचं ट्विट

समितीमध्ये कुणाचा समावेश

सर्वोच्च न्यायालयाने चार सदस्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीत भारतीय किसान यूनियनचे नेते भूपिंदर सिंह मान, आंतरराष्ट्रीय खाद्य नीती संस्थेचे डॉ. प्रमोदकुमार जोशी, कृषी अर्थतज्ज्ञ अशोक गुलाटी आणि शेतकरी संघटनेचे नेते अशोक घनवट यांचा समावेश आहे. शेतकरी नेते भूपिंदर सिंह मान यांनी उघडपणे आणि घनवट यांनी काही सुधारणा सुचवून या कायद्यांना पाठिंबा दिला आहे.

संबंधित बातम्या:

कृषी कायद्यासाठीच्या समितीत चौघांपैकी दोघे कायद्याचे समर्थक; ‘हा’ मराठमोळा नेताही समितीत

Supreme Court stays Farm laws | जय किसान! मोदी सरकारला सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्का, कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती

(Satej Patil said struggle of farmer protest not end after Supreme Court decision)

Follow Us
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.