Pm Modi Birthday : वडनगर ते वाराणसी : सेवेची एक प्रेरणादायी यात्रा

या सेवा यात्रेत , संपर्क, युवकांचा सहभाग, समाजकल्याण, सांस्कृतिक बांधिलकी आणि सामुदायिक जनसहभाग या विविध पैलूंना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Pm Modi Birthday : वडनगर ते वाराणसी : सेवेची एक प्रेरणादायी यात्रा
PM MODI SEVA SANKALP ABHIYAAN VADNAGAR TO VARANASI
| Updated on: Sep 20, 2026 | 6:22 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७६ वा वाढदिवस १७ सप्टेंबर रोजी जगभरात साजरा करण्यात आला. या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. मोदी यांच्या सेवेला समर्पित सार्वजनिक जीवनाचा गौरव म्हणून त्यांच्या राष्ट्रसेवेला सेवेला समर्पित अशी ही एक अनोखी आणि अशा प्रकारची पहिलीच यात्रा आयोजित करण्यात आहे.या यात्रेसाठी २० पथके, एकच संकल्प – सेवा, आणि एकूण ३५,५०० किलोमीटरचा प्रवास घडणार आहे.

१७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत ही २० पथके वडनगर ते वाराणसी आणि वाराणसी ते वडनगर असा प्रवास करीत आहेत. ही केवळ मोटारसायकल यात्रा नसून त्यापेक्षा खूप व्यापक आणि अर्थपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.ही पथके शहरांमधून, जिल्ह्यांमधून, तालुक्यांमधून आणि गावांमधून प्रवास करत सेवाभावाची प्रेरणा थेट तळागाळापर्यंत पोहोचवत आहेत.

ही सेवा यात्री केवळ समुदायांमधून मार्गक्रमण करीत नाहीत, तर प्रत्येक पडावावर थांबून लोकांशी संवाद साधत आहेत आणि स्थानिक गरजांनुसार विविध सेवा उपक्रम राबवत आहेत. तलाव, मंदिरे, शाळा, उद्याने, रुग्णालये आणि इतर सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबवल्या जात आहेत. लाभार्थी संवाद, युवा संवाद, ग्रामसभा चर्चा, गोसेवा तसेच ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण यांसारखे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

ही सेवा यात्रा पीएम श्री शाळांमध्ये, सेवा यात्री शाळांचा परिसर स्वयंसेवक स्वच्छ करीत आहेत, विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत तसेच पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य वितरित करीत आहेत.रुग्णालये, अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमांमध्ये ते गरजू व्यक्तींना यात्रेत मदतीचा हात दिला जात आहेत.

विधवांना विविध साहित्य-किट्सचे वितरण या यात्रेत केला जात आहे. या यात्रेत ‘आशा’ कार्यकर्त्यांचा सन्मान केला जात आहे आणि विविध समाजकल्याण उपक्रमांद्वारे समुदायांना एकत्र आणले जात आहे

ही यात्रा संपर्क आणि संवादाचीही यात्रा म्हटली जात आहे. युवा संवाद, ग्रामसभा चर्चा, महिला संवाद आणि लाभार्थी भेटी यांद्वारे लोकांना प्रत्यक्ष भेटण्याची, त्यांच्या आकांक्षा समजून घेण्याची आणि तळागाळात जनजागृती करण्याची संधी या यात्रेमुळे निर्माण होत आहे. या यात्रेत अववयदानाची महत्व समजावून सांगतिले जात आहे.

अवयवदानाची सामुहिक प्रतिज्ञा घेतली जात असल्यामुळे समाजात दानभावनेला प्रोत्साहन मिळत आहे, तर शहीद आणि स्वातंत्र्यसैनिकांना वाहिलेल्या श्रद्धांजलीद्वारे समुदायांचा देशाच्या इतिहासाशी आणि त्याच्या वीरांशी भावनिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत मिळत आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us