Udaipur Murder Case : उदयपूर हत्याकांडानंतर प्रशासन सतर्क, परिसरात 600 पोलीस तैनात

| Updated on: Jun 29, 2022 | 12:39 AM

मी वारंवार पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना सांगत आहे, देशाला संबोधित करा. उदयपूरची ही घटना काही किरकोळ घटना नाही, कोणीही हे करू शकतो हे कल्पनेपलीकडचे आहे. अशा वेळी तणाव निर्माण होऊ नये, सर्वांनी एकत्र राहावे, अशी आमची इच्छा आहे. या घटनेतील दोषींना सोडले जाणार नाही, असे अशोक गहलोत म्हणाले.

Udaipur Murder Case : उदयपूर हत्याकांडानंतर प्रशासन सतर्क, परिसरात 600 पोलीस तैनात
उदयपूर हत्याकांडानंतर प्रशासन सतर्क
Follow us on

उदयपूर : राजस्थानमधील उदयपूरमध्ये एका व्यक्तीची भरदिवसा निर्घृण हत्या (Murder) केल्यानंतर राज्यात तणाव (Tension) पसरला आहे. या घटनेचा एक भयानक व्हिडिओ समोर आल्यानंतर याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण अधिकच संवेदनशील (Sensitive) बनले आहे. संपूर्ण राज्यात गस्त वाढवण्याचे आदेश एसपी आणि आयजींना दिले आहेत. अधिकाऱ्यांसह सुमारे 600 पोलिसांचा फौजफाटा उदयपूरमध्ये पाठवण्यात आला असून, आणखी काही फौजफाटा पाठवण्यात येणार आहे. हत्येची माहिती मिळताच परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आम्ही पथके पाठवली आहेत, असे उदयपूरचे एसपी मनोज कुमार यांनी सांगितले.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओही आम्ही पाहिला आहे. गुन्हेगाराची जात नसते. पीडित कुटुंबाला शक्य तेवढी मदत केली जाईल, तरतुदीनुसार कारवाई केली जाईल, असे उदयपूरचे जिल्हाधिकारी तारा चंद मीना म्हणाले.

हत्येची बाब दुःखद आणि लज्जास्पद – अशोक गेहलोत

या घटनेबाबत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अशाप्रकारे एखाद्याची हत्या होणे ही चिंतेची बाब आहे, हे दुःखद आणि लज्जास्पद आहे. वातावरण सुधारण्याची गरज आहे, संपूर्ण देशात तणावाचे वातावरण आहे. मी वारंवार पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना सांगत आहे, देशाला संबोधित करा. उदयपूरची ही घटना काही किरकोळ घटना नाही, कोणीही हे करू शकतो हे कल्पनेपलीकडचे आहे. अशा वेळी तणाव निर्माण होऊ नये, सर्वांनी एकत्र राहावे, अशी आमची इच्छा आहे. या घटनेतील दोषींना सोडले जाणार नाही, असे अशोक गहलोत म्हणाले. (Police administration alerted after Udaipur murder case, 600 police deployed in the area)

हे सुद्धा वाचा