AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्हीच शिवसेना, शिंदे गटाच्या वकिलाचा थेट सुप्रीम कोर्टात दावा; कोर्टात घटनाक्रमच सांगितला

21 जून ते 4 जुलैपर्यंतचा हा घटनाक्रम त्यांनी सांगितला. ठाकरे गटाने बहुमतावर आक्षेप घेतला. त्या बहुमत चाचणीचं कौल यांनी समर्थन केलं. तसेच लोकशाहीतील बहुमत चाचणीचं महत्त्व कोर्टाला सांगितलं. नार्वेकर बहुमत चाचणीनेच निवडून आले आहेत.

आम्हीच शिवसेना, शिंदे गटाच्या वकिलाचा थेट सुप्रीम कोर्टात दावा; कोर्टात घटनाक्रमच सांगितला
supreme court Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 01, 2023 | 2:18 PM
Share

नवी दिल्ली : महाराष्ट्रावरील सत्तासंघर्षाच्या सुनावणीच्या पाचव्या दिवशी आज शिंदे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी सर्वोच्च न्यायालयात शिवसेना फुटीपासूनचा घटनाक्रमच मांडला. हा घटनाक्रम मांडताना आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा दावाही केला. शिवसेनेत फूट पडली नाही. अंतर्गत मतभेद आहेत. मतभेद हा गौण मुद्दा आहे, असा दावा करत नीरज कौल यांनी ठाकरे गटाची चांगलीच कोंडी केली.

नीरज कौल यांनी आज सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाची जोरदार बाजू मांडली. पक्ष फूट आणि विलीनीकरणाबाबत कधीही युक्तिवाद केला नाही. आम्हीच शिवसेना आहोत. तशी मान्यता आम्हाला मिळाली आहे. आम्ही भाजपसोबत सुरुवात केली होती. काँग्रेस सोबत जाणं शक्य नव्हतं. कारण सुरुवातीपासूनच त्यांचं आमचं कधी जुळलं नव्हतं, असं नीरज कौल यांनी कोर्टाला सांगितलं. 2019पर्यंत भाजप आणि शिवसेनेची युती होती. 21 जुनला शिंदे गटाची पहिली बैठक झाली. बैठकीला 34 आमदार उपस्थित होते. बैठकीत भरत गोगावले यांची मुख्यप्रतोद पदी नियुक्ती करण्यात आली. तर सुनील प्रभू यांची नेमणूक शिंदे गटाकडून रद्द करण्यात आली, अशी माहितीही त्यांनी कोर्टाला दिली.

दहावी अनुसूची

10व्या सूचीनुसार अपात्रतेचा निर्णय अध्यक्षच घेऊ शकतात. दहावी सूची आम्हाला लागूच होत नाही. पक्षात फूट नव्हती तर अंतर्गत मतभेद होते, असं कौल यांनी कोर्टाला सांगितलं. त्यावर दहावी अनुसूची तुम्हाला लागू होते, असं सरन्यायाधीशांनी त्यांनी सांगितलं.

घटनाक्रमच सांगितला

राज्यपालांचं बहुमत चाचणीचं पत्रक रद्द करा अशी मागणी सिंघवी यांनी केली होती. राज्यपालांचं पत्रक रद्द केल्यास परिस्थिती जैसे थी होईल. राज्यपालांना राजकीय पक्षात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, असा मुद्दा काल अभिषेक मनू सिंघवी यांनी मांडला होता. तोच धागा पकडून नीरज कौल यांनी संपूर्ण घटनाक्रमच कोर्टाला सांगितला. 21 जून ते 4 जुलैपर्यंतचा हा घटनाक्रम त्यांनी सांगितला. ठाकरे गटाने बहुमतावर आक्षेप घेतला. त्या बहुमत चाचणीचं कौल यांनी समर्थन केलं. तसेच लोकशाहीतील बहुमत चाचणीचं महत्त्व कोर्टाला सांगितलं. नार्वेकर बहुमत चाचणीनेच निवडून आले आहेत. याकडेही त्यांनी कोर्टाचं लक्ष वेधलं.

म्हणून मान्यता मिळाली

पक्षाचं चिन्हं दोन गटाला दिलं जात नाही. बहुमताचा विचार करूनच आम्हाला चिन्ह मिळालं. निवडणूक आयोगाने वस्तुस्थिती तपासून निर्णय दिला. पक्ष फुटीचा दावा न केल्याने शिवसेना म्हणून मान्यता दिली, याकडेही कौल यांनी कोर्टाचं लक्ष वेधलं.

दरम्यान, आजच्या सुनावणीवर वकील विशाल जोगदंड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवसेनेचे वकील पूर्णपणे दहावी सूची नाकारत आहेत. विधिमंडळ पार्टी आणि राजकीय पार्टी म्हणून आम्ही एकच आहोत . आमच्यात फूट पडली नाही. पक्षाचे सर्वेसर्वा आम्ही आहोत. मतभेद छोटा मुद्दा आहे, असं नीरज कौल म्हणाले. सरन्यायाधीश म्हणाले तुम्ही १०व्या सूचीत येता, अशी माहिती जोगदंड यांनी दिली.

Follow Us
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?
जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये...
Tejaswi Ghosalkar | जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी!
मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद
Mohan Bhagwat | मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद; भारताच्या उज्ज्वल भविष्यावर मांडणार विचार
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र 'या' नेत्याने फिरवली पाठ, नेमकं कारण...
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?