घराबाहेरच बड्या संगीतकाराची हत्या… राहुल गांधी संतापले; थेट केंद्रीय गृहमंत्रालय आणि..

मणिपूरचे प्रसिद्ध संगीतकार विक्रम सिंह यांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ माजली. आता या प्रकरणावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे.

घराबाहेरच बड्या संगीतकाराची हत्या... राहुल गांधी संतापले; थेट केंद्रीय गृहमंत्रालय आणि..
Rahul Gandi
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 08, 2026 | 12:54 PM

मणिपूरचे प्रसिद्ध संगीतकार विक्रम सिंह यांच्या हत्येनंतर काँग्रेस नेते राहुल गांधींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दिल्लीतील या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना राहुल गांधी म्हणाले की, देशाच्या राजधानीत स्वतःच्या घराबाहेर एका वडिलांची हत्या होणे हे अत्यंत गंभीर आहे. ईशान्य भारतातील नागरिकांच्या सुरक्षेबाबत दिल्लीतील कुटुंबांमध्ये चिंता निर्माण झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

नेमकं काय घडलं?

विक्रम सिंह आपल्या घराबाहेर आवाज कमी करण्यास सांगण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना मारहाण करून ठार करण्यात आल्याचा आरोप आहे. ही घटना दिल्लीसारख्या शहरात घडल्याने अनेक जणांना धक्का बसला आहे. विशेषतः ईशान्येकडील नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. राहुल गांधी यांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेत म्हटले की, अशा घटनांमुळे दिल्लीत राहणाऱ्या ईशान्य भारतीय कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दोषींना कठोर शिक्षा द्यावी

वाढत्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले. ते म्हणाले की, राजधानीत अशा हिंसक घटना घडत असताना संबंधित यंत्रणांनी वेळीच आणि प्रभावी कारवाई केली पाहिजे. तातडीने तपास करून दोषींना न्यायाच्या चौकटीत आणावे, अशी मागणीही त्यांनी केली. हत्येच्या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सरकारने तात्काळ पावले उचलण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

विक्रम सिंह यांच्या हत्येने केवळ एका कुटुंबाचे नुकसान झाले नसून, संपूर्ण समाजामध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. संगीत क्षेत्रात योगदान देणाऱ्या या कलाकाराच्या मृत्यूने मणिपूरसह देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. राहुल गांधी यांनी या घटनेला ‘गंभीर अपयश’ म्हटले असून, कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडण्यात संबंधित यंत्रणांकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचे मत व्यक्त केले.

या प्रकरणात तात्काळ आणि निष्पक्ष तपास होणे आवश्यक आहे. दोषींना शिक्षा मिळाल्यासच लोकांचा विश्वास कायदा-सुव्यवस्थेवर टिकून राहील, असे मत काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केले आहे. राहुल गांधी यांच्या या प्रतिक्रियांनंतर या प्रकरणाकडे अधिक लक्ष वेधले जाण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांकडून याबाबत अधिक माहिती येण्याची अपेक्षा आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us