7/11 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाला 16 वर्षे पूर्ण ; विरोधाच्या साक्षीदारांनी श्रद्धांजली वाहत मृतांना अभिवादन केले

| Updated on: Jul 11, 2022 | 3:57 PM

लष्कर-ए-तैयबाने मे 2006 मध्ये 50 तरुणांना बहावलपूर येथील प्रशिक्षण शिबिरात पाठवले होते. त्यांना बॉम्ब बनवण्याचे आणि बंदुका चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यासोबतच कोणकोणत्या डावपेचांचा अवलंब करावा, याचा सामना करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. लष्कर-ए-तैयबाने वेगवेगळ्या मार्गाने भारतात प्रवेश केला होता

1 / 5
16  वर्षांपूर्वी 11 जुलै 2006 रोजी मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोटांची मालिका घडली होती. ज्यात 189 लोक मारले गेले होते तर 824 जण जखमी झाले होते.  मुंबईच्या पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांमध्ये 11 मिनिटांच्या अंतराने सात स्फोट झाले होते.

16 वर्षांपूर्वी 11 जुलै 2006 रोजी मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोटांची मालिका घडली होती. ज्यात 189 लोक मारले गेले होते तर 824 जण जखमी झाले होते. मुंबईच्या पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांमध्ये 11 मिनिटांच्या अंतराने सात स्फोट झाले होते.

2 / 5
2006 च्या मुंबई ट्रेन बॉम्बस्फोटात वाचलेले मात्र आपला एका हात गमावलेले महेंद्र पितळे, यांनी आज मुंबईमधील माहिमी रेल्वेस्थानकावर उपस्थित  राहत   या घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या  नागरिकांना श्रद्धांजली वाहली.

2006 च्या मुंबई ट्रेन बॉम्बस्फोटात वाचलेले मात्र आपला एका हात गमावलेले महेंद्र पितळे, यांनी आज मुंबईमधील माहिमी रेल्वेस्थानकावर उपस्थित राहत या घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहली.

3 / 5
2006 ला पहिला स्फोट दुपारी 4.35 च्या सुमारास झाला. काही मिनिटांतच माटुंगा, वांद्रे, खार, जोगेश्वरी, बोरिवली आणि भाईंदरजवळील उपनगरीय गाड्यांमध्ये स्फोट झाले.

2006 ला पहिला स्फोट दुपारी 4.35 च्या सुमारास झाला. काही मिनिटांतच माटुंगा, वांद्रे, खार, जोगेश्वरी, बोरिवली आणि भाईंदरजवळील उपनगरीय गाड्यांमध्ये स्फोट झाले.

4 / 5

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2006 मध्ये लष्कर-ए-तैयबाच्या आझम चीमा याने सिमी आणि लष्कर या दोन गटांच्या प्रमुखांसह त्याच्या बहावलपूर येथील घरात या स्फोटांची योजना आखली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2006 मध्ये लष्कर-ए-तैयबाच्या आझम चीमा याने सिमी आणि लष्कर या दोन गटांच्या प्रमुखांसह त्याच्या बहावलपूर येथील घरात या स्फोटांची योजना आखली होती.

5 / 5
लष्कर-ए-तैयबाने मे 2006 मध्ये 50 तरुणांना बहावलपूर येथील प्रशिक्षण शिबिरात पाठवले होते. त्यांना बॉम्ब बनवण्याचे आणि बंदुका चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यासोबतच  कोणकोणत्या डावपेचांचा अवलंब करावा, याचा सामना करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.  लष्कर-ए-तैयबाने वेगवेगळ्या मार्गाने भारतात प्रवेश केला होता, जो मुंबईत पोहोचला आणि चार वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागला. त्यापैकी दोघे मालाडमध्ये, चार वांद्रे, दोन बोरिवली आणि तीन मुंब्रा येथे वास्तव्यास होते

लष्कर-ए-तैयबाने मे 2006 मध्ये 50 तरुणांना बहावलपूर येथील प्रशिक्षण शिबिरात पाठवले होते. त्यांना बॉम्ब बनवण्याचे आणि बंदुका चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यासोबतच कोणकोणत्या डावपेचांचा अवलंब करावा, याचा सामना करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. लष्कर-ए-तैयबाने वेगवेगळ्या मार्गाने भारतात प्रवेश केला होता, जो मुंबईत पोहोचला आणि चार वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागला. त्यापैकी दोघे मालाडमध्ये, चार वांद्रे, दोन बोरिवली आणि तीन मुंब्रा येथे वास्तव्यास होते