2026 मधील सर्वांत वादग्रस्त चित्रपट, 2 महिन्यांनंतर अखेर ओटीटीवर; देशभरात झाला होता वाद

2026 या वर्षातील सर्वांत चर्चेतला आणि वादग्रस्त चित्रपट अखेर ओटीटीवर स्ट्रीम होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यावरून कोर्टात प्रकरण सुरू होतं. देशभरात विरोध झाल्यानंतर अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि आता तो ओटीटीवर येत आहे.

| Updated on: Apr 27, 2026 | 2:08 PM
1 / 5
या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून मोठा वाद झाला होता. 2026 मधला हा सर्वांत वादग्रस्त चित्रपट ठरला. या चित्रपटाचं नाव आहे 'द केरळ स्टोरी 2: गोज बियाँड'. आता हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजेच ओटीटीवर येण्यासाठी सज्ज झाला आहे. विपुल शाह निर्मित आणि कामाख्या नारायण सिंह दिग्दर्शित हा चित्रपट जवळपास दोन महिन्यांपूर्वी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून मोठा वाद झाला होता. 2026 मधला हा सर्वांत वादग्रस्त चित्रपट ठरला. या चित्रपटाचं नाव आहे 'द केरळ स्टोरी 2: गोज बियाँड'. आता हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजेच ओटीटीवर येण्यासाठी सज्ज झाला आहे. विपुल शाह निर्मित आणि कामाख्या नारायण सिंह दिग्दर्शित हा चित्रपट जवळपास दोन महिन्यांपूर्वी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

2 / 5
27 फेब्रुवारी 2026 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेला हा चित्रपट 2023 मधल्या 'द केरळ स्टोरी'चा सीक्वेल आहे. सीक्वेल असला तरी पहिल्या आणि दुसऱ्या भागाचं काही कनेक्शन नाही. परंतु कथेचा थीम एकच आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जेमतेम कमाई केली होती.

27 फेब्रुवारी 2026 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेला हा चित्रपट 2023 मधल्या 'द केरळ स्टोरी'चा सीक्वेल आहे. सीक्वेल असला तरी पहिल्या आणि दुसऱ्या भागाचं काही कनेक्शन नाही. परंतु कथेचा थीम एकच आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जेमतेम कमाई केली होती.

3 / 5
या चित्रपटावर प्रचारकी आणि समाजात द्वेष पसरवणारा असल्याची टीका झाली होती. आता येत्या 8 मे रोजी हा चित्रपट झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे. 2 तास 11 मिनिटांचा हा चित्रपट हिंदू मुलींचं बळजबरीने धर्मांतर आणि त्यांच्या शोषणावर आधारित आहे.

या चित्रपटावर प्रचारकी आणि समाजात द्वेष पसरवणारा असल्याची टीका झाली होती. आता येत्या 8 मे रोजी हा चित्रपट झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे. 2 तास 11 मिनिटांचा हा चित्रपट हिंदू मुलींचं बळजबरीने धर्मांतर आणि त्यांच्या शोषणावर आधारित आहे.

4 / 5
मध्यप्रदेश, केरळ आणि राजस्थान अशा तीन राज्यांमधील मुलींची कथा यात दाखवण्यात आली आहे. धर्मांतराच्या नावाखाली तरुणींची केली जाणारी फसवणूक हा गंभीर मुद्दा यात अधोरेखित करण्यात आला आहे. यामध्ये उल्का गुप्ता, अदिती भाटिया आणि ऐश्वर्या ओझा यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

मध्यप्रदेश, केरळ आणि राजस्थान अशा तीन राज्यांमधील मुलींची कथा यात दाखवण्यात आली आहे. धर्मांतराच्या नावाखाली तरुणींची केली जाणारी फसवणूक हा गंभीर मुद्दा यात अधोरेखित करण्यात आला आहे. यामध्ये उल्का गुप्ता, अदिती भाटिया आणि ऐश्वर्या ओझा यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

5 / 5
मुस्लीम मुलांशी प्रेमात पडल्यानंतर या तिन्ही मुलींच्या आयुष्यात जे भयानक वळण येतं, त्याचं चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे. केरळ उच्च न्यायालयात या चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.

मुस्लीम मुलांशी प्रेमात पडल्यानंतर या तिन्ही मुलींच्या आयुष्यात जे भयानक वळण येतं, त्याचं चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे. केरळ उच्च न्यायालयात या चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.

Follow Us