
आचार्य चाणक्य हे अर्थशास्त्रातील महान तज्ज्ञ असल्याचे सांगितले जाते. अर्थशास्त्रासोबत त्यांना राजाकारणातही मोठे ज्ञान होते. त्यांनी रोजच्या जीवनात जगताना काय काळजी घेतली पाहिजे? याबाबतही काही सल्ले दिलेल आहेत.

त्यांनी स्त्रियांमध्ये काही खास गुण असतात असे सांगितले आहे. चाणक्य यांच्या मतानुसार स्त्रिया अनेक बाबतीत पुरुषांपेक्षा सरस असतात. स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा सहा पट धाडस असते. तसेच त्या पुरुषांपेक्षा आठ पटीने भावनिक असतात.

स्त्रिया या पुरुषांपेक्षाही लाजऱ्या असतात, असेही चाणक्य यांनी सांगितलेले आहे. स्त्रिया या पुरुषांपेक्षा खूप सहनशील असतात. स्त्रिया सहनशील असल्या तरी त्या कमजोर मात्र नसतात. कोणत्याही संकटाला तोंड देण्याची त्यांच्यात हिंमत असते, असे आचार्य चाणक्य सांगतात.

यासह साहस असणाऱ्या, संकटाला तोंड देणाऱ्या स्त्रिया ज्या पुरुषाच्या आयुष्यात येतात, त्या पुरुषाच्या पायाशी सुख लोळण घेते, असे आचार्य चाणक्य सांगतात. सोबतच स्त्रियांचा सन्मान करायला हवा, असेही चाणक्य यांनी सांगितलेले आहे.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.