गाणं पाहिजे तर असं, ऐकताच गुणगुणतात लोक तर काहीजण धरतात ठेका, 32 वर्षांपासून सुपरहिट, मुलीवर नाही तर दारूच्या बाटलीवर होतं आधारित

मुलीवर नाही तर दारूच्या बाटलीवर लिहिलेलं अक्षय कुमार-रवीना टंडनचं सर्वात रोमँटिक गाणं. 32 वर्षांपासून प्रत्येकजण ऐकतो. ऐकताच अनेकजण धरतात ठेका. दिवसभर गुणगुणतात.

| Updated on: Jul 04, 2026 | 6:26 PM
1 / 5
90 च्या दशकातील सुपरहिट गाण्यांमध्ये आजही आवर्जून घेतले जाणारे ‘तू चीज बड़ी है मस्त-मस्त’ हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. लग्नसमारंभ, पार्ट्या आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये हे गाणे आजही लोकांना ठेका धरायला भाग पाडते.

90 च्या दशकातील सुपरहिट गाण्यांमध्ये आजही आवर्जून घेतले जाणारे ‘तू चीज बड़ी है मस्त-मस्त’ हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. लग्नसमारंभ, पार्ट्या आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये हे गाणे आजही लोकांना ठेका धरायला भाग पाडते.

2 / 5
1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहरा’ चित्रपटातील हे गाणे प्रचंड गाजले होते. या चित्रपटात अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांची जोडी झळकली होती. पुढे 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मशीन’ चित्रपटात या गाण्याचा रिमेक करण्यात आला.

1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहरा’ चित्रपटातील हे गाणे प्रचंड गाजले होते. या चित्रपटात अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांची जोडी झळकली होती. पुढे 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मशीन’ चित्रपटात या गाण्याचा रिमेक करण्यात आला.

3 / 5
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘मोहरा’चे दिग्दर्शक राजीव राय यांना सुरुवातीला ‘तू चीज बड़ी है मस्त-मस्त’ हे गाणे अजिबात पसंत पडले नव्हते. त्यांना या गाण्याचे शब्द अतिशय स्वस्त आणि हलक्या दर्जाचे वाटले. त्यामुळे हे गाणे चित्रपटात ठेवण्यास त्यांनी नकार दिला होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘मोहरा’चे दिग्दर्शक राजीव राय यांना सुरुवातीला ‘तू चीज बड़ी है मस्त-मस्त’ हे गाणे अजिबात पसंत पडले नव्हते. त्यांना या गाण्याचे शब्द अतिशय स्वस्त आणि हलक्या दर्जाचे वाटले. त्यामुळे हे गाणे चित्रपटात ठेवण्यास त्यांनी नकार दिला होता.

4 / 5
गीतकार आनंद बक्षी यांनी जेव्हा या गाण्याचे बोल राजीव राय यांना ऐकवले, तेव्हा त्यांनी ते चीप असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यावर आनंद बक्षी यांनी स्पष्ट केले की, हे गाणं कोणत्याही मुलीवर लिहिलेले नसून ते दारूच्या बाटलीवर आधारित आहे. ही बाब समजल्यानंतर राजीव राय यांनी अखेर हे गाणे चित्रपटात ठेवण्याचा निर्णय घेतला.

गीतकार आनंद बक्षी यांनी जेव्हा या गाण्याचे बोल राजीव राय यांना ऐकवले, तेव्हा त्यांनी ते चीप असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यावर आनंद बक्षी यांनी स्पष्ट केले की, हे गाणं कोणत्याही मुलीवर लिहिलेले नसून ते दारूच्या बाटलीवर आधारित आहे. ही बाब समजल्यानंतर राजीव राय यांनी अखेर हे गाणे चित्रपटात ठेवण्याचा निर्णय घेतला.

5 / 5
या गाण्याचे चित्रीकरण मुंबईतील फिल्मालय स्टुडिओमध्ये उभारलेल्या खास सेटवर करण्यात आले होते. विशेष म्हणजे, या गाण्याचे शूटिंग अत्यंत गुप्तपणे पार पडले. सेटवर केवळ गाण्याशी संबंधित कलाकार, तंत्रज्ञ आणि निर्मिती पथकालाच प्रवेश होता. इतर कोणालाही सेटवर जाण्याची परवानगी नव्हती.

या गाण्याचे चित्रीकरण मुंबईतील फिल्मालय स्टुडिओमध्ये उभारलेल्या खास सेटवर करण्यात आले होते. विशेष म्हणजे, या गाण्याचे शूटिंग अत्यंत गुप्तपणे पार पडले. सेटवर केवळ गाण्याशी संबंधित कलाकार, तंत्रज्ञ आणि निर्मिती पथकालाच प्रवेश होता. इतर कोणालाही सेटवर जाण्याची परवानगी नव्हती.

Follow Us