Amit Satam: आधी दुर्घटनेवर हसले आणि आता आढावा घ्यायला पोहोचले, काय म्हणाले अमित साटम?
Amit Satam: काल आमदार अमित साटम यांचा हसतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आज ते वीर देसाई रोडवर साचलेल्या पाण्याचा आठावा घेण्यासाठी पोहोचले आहेत. त्यावेळी त्यांनी टीव्ही 9 मराठीशी देखील संवाद साधला...

मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये विरोधी बाकावरचे नेते आमदार जयंत पाटील यांच्याशी संवाद साधताना साहेब काल झाडावर होतं, आज मॅनहोल झालं, असं बोलताना अमित साटम हसत होते. त्यांचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आज अमित साटम हे मिरा देसाईरोड परिसरातील आठावा घेण्यासाठी पोहोचले आहेत. तेथे पाणी कशामुळे साठले आहे? याबाबत ते जाणून घेत आहेत.

वीर देसाई रोडवर आढावा घेताना अमित साटम यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, आज आम्ही मिरा देसाई रोडवर पाणी तुंबलं असल्यामुळे नेमकं कारण काय आहे? हे बघण्यासाठी महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांसोबत आम्ही इथे आलो आहोत. हा भाग सखल असल्यामुळे हाय टाईड असल्यामुळे, नाल्याची उंची जास्त असल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाहीये. त्यामुळे इथे आपण काय उपाय योजना करु शकतो, किती पंप लावले आहेत किंवा गाळ कुठे साचला आहे का, प्लास्टीक कुठे अडकलं आहे का, याची पाहणी करण्याकरता आम्ही आलो आहे.

पुढे अमित साटम म्हणाले, विरोधी नेते टीका करतायेत त्या विरोधी नेत्यांनीच पंचवीस वर्षे मुंबई शहरावर राज्य केले आहे आणि पंचवीस वर्षामध्ये मुंबईच्या पावसामध्ये कॉम्प्रेहेंसीव्ह सोल्यूशन न काढल्यामुळे ही आजची परिस्थीती निर्माण झाली आहे. आता मुंबईच्या महानगरपालिकेने आयआयटी बॉम्बे बरोबर कॉम्प्रेहेंसीव्ह प्रस्ताव तयार केला आहे. केंद्र शासनासमोर सादर केला आहे. केंद्र शासन त्याला 60 टक्के पेक्षा जास्त निधी हा महानगर पालिकेला देणार आहे. हा प्रोजेक्ट कॉम्प्रेहेंसीव्ह फ्लडिंग मेजरचा झाल्याशिवाय मुंबई शहरामध्ये पाऊस असताना, हाय टाईड असताना, हेवी पाऊस असताना त्यावेळी जे पाणी साचते तो पर्यंत हे कॉम्प्रेहेंसीव्ह सोल्यूशन आल्याशिवाय याच्यातून आपल्याला या ठिकाणी विश्रांती मिळणार नाही.

विधिमंडळ परिसरातील अमित साटम यांचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला होता. अमित साटम या व्हिडीओत चक्क हसत असताना दिसत होते. मुंबईत झालेल्या दोन दुर्घटनांचा उल्लेख करून ते जयंत पाटील यांच्यासोबत बोलताना हासत होते. स्कुलबसवर झाड कोसळल्याने एका चिमुकल्याचा मृत्यू झाला. त्यात एका कुटुंबाने चिमुकला गमावला. 2 जुलै रोजी एका व्यक्तीचा मॅनहोलमध्ये मृत्यू झालेला असताना साटम मात्र हसत असल्याने संताप व्यक्त केला जात होता.

आता साटम यांनी वीर देसाई रोडवर पावसामुळे साचलेल्या पाण्याचा आढवा घेतला आहे. त्यांनी मुंबई पालिकेच्या एका व्यक्तीशी देखील चर्चा केली आहे.