IND-AUS : संतापलेल्या क्रिकेट चाहत्यांचा सोशल मीडियावर कहर
प्रथम फलंदाजी करीत असताना टीम इंडियाने 208 एव्हढी मोठी धावसंख्या उभारली होती

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिला सामना नागपूरमध्ये हारल्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांवरती जोरदार टीका करण्यात आली. आशिया चषकात खराब कामगिरी केल्यानंतर सुद्धा टीममध्ये संधी दिल्याने चाहत्यांनी सिलेक्श टीमवरती टीका केली होती.

प्रथम फलंदाजी करीत असताना टीम इंडियाने 208 एव्हढी मोठी धावसंख्या उभारली होती. केएल राहूल, हार्दीक पांड्या आणि सुर्यकुमार यादव यांनी चांगली फलंदाजी केली.

अजून दोन सामने बाकी आहेत, त्या सामन्यात खेळाडू कसे खेळ करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. काही खेळाडू तंदुरुस्त असून सुद्धा त्यांना संधी न दिल्याने रवी शास्त्री संपापले होते.

निराश झालेल्या चाहत्यांनी सोशल मीडियावरती खेळाडूंच्या मीम्स व्हायरल केल्या आहे. त्याध्ये अधिक गोलंदाजांच्या मीम्स आहेत. भुवनेश्वर कुमार याची गोलंदाजी खराब होत असल्याने त्याचा फटका टीम इंडियाला बसत आहे. विशेष म्हणजे गोलंदाजांवरती टीका होत आहे.