नवीन भांडी खरेदी करायला शुभ मुहुर्त शोधताय? आठवड्यातील या दोन दिवशी करा खरेदी

धनत्रयोदशीव्यतिरिक्त हे दोन वार नवीन भांडी खरेदीसाठी अत्यंत शुभ मानले जातात. यामुळे भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पती यांची कृपा होते, ज्यामुळे धनप्राप्तीचे मार्ग उघडतात.

| Updated on: Oct 24, 2025 | 4:47 PM
1 / 9
हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवशी खरेदीसाठी स्वतःचे विशेष महत्त्व सांगितले आहे. सामान्यतः, लोक धन आणि समृद्धीसाठी दिवाळीपूर्वी येणाऱ्या धनत्रयोदशीलाच नवीन भांडी किंवा धातूच्या वस्तूंची खरेदी करणे शुभ समजतात.

हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवशी खरेदीसाठी स्वतःचे विशेष महत्त्व सांगितले आहे. सामान्यतः, लोक धन आणि समृद्धीसाठी दिवाळीपूर्वी येणाऱ्या धनत्रयोदशीलाच नवीन भांडी किंवा धातूच्या वस्तूंची खरेदी करणे शुभ समजतात.

2 / 9

परंतु ज्योतिषशास्त्रानुसार, आठवड्यात दोन असे दिवस देखील असतात. ज्या दिवशी तुम्ही जर नवीन भांडी खरेदी केलात, तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची तुमच्यावर विशेष कृपा प्राप्त होते.

3 / 9

गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवशी तुम्ही भांडी किंवा धातूच्या वस्तू खरेदी करायला हव्यात. धनत्रयोदशी व्यतिरिक्त, गुरुवार आणि शुक्रवारी नवीन भांडी खरेदी करणे इतके शुभ का मानले जाते? यामुळे घरात सुख-समृद्धी कशी टिकून राहते, हे जाणून घेऊया.

4 / 9

गुरुवारचा दिवस देवगुरु बृहस्पती गुरू आणि भगवान विष्णूंना समर्पित आहे. बृहस्पती ग्रह धन, समृद्धी, ज्ञान आणि सौभाग्याचा कारक मानले जाते. त्यामुळे या दिवशी नवीन भांडी, विशेषत: पितळ किंवा तांब्याची भांडी खरेदी करणे खूपच फलदायी ठरते.

5 / 9

गुरुवारी भांडी खरेदी केल्याने घरात धनप्राप्तीचे नवीन मार्ग उघडतात. यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होते. गुरूच्या कृपेने उत्पन्नात वाढ होते. या दिवशी खरेदी केलेली भांडी स्वयंपाकघरातील अन्नाच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जेचा संचार करतात.

6 / 9

गुरुवारी भांडी खरेदी केल्याने कुटुंबातील सदस्यांच्या बुद्धी आणि ज्ञानात वाढ होते. भगवान विष्णूच्या कृपेने घरात शांती आणि सलोखा टिकून राहतो.

7 / 9

शुक्रवार हा दिवसही शुभ मानला जातो. शुक्र हा ग्रह थेट धनाची देवी माता लक्ष्मी आणि सौंदर्य तसेच ऐश्वर्याचा कारक यांना समर्पित आहे. या दिवशी नवीन भांडी घरी आणणे म्हणजे, घरात धन आणि वैभवाला आमंत्रित करणे असे म्हणतात.

8 / 9

शुक्रवारी नवीन भांडी खरेदी केल्याने माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते आणि घरात कायमस्वरूपी वास करते. या दिवशी खरेदी केलेल्या वस्तूंमुळे घरात धन-धान्याची कमतरता जाणवत नाही. त्यामुळे जीवनात भौतिक सुख-सुविधा वाढतात. शुक्रवारी घरात प्रवेश करणारी प्रत्येक नवीन वस्तू आपल्यासोबत शुभ आणि सकारात्मकता घेऊन येते.

9 / 9

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us