किल्ले प्रतापगडाचा इतिहास वर्षानुवर्षे आपण ऐकत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं प्रतिक म्हणून या किल्ल्याकडे पाहिलं जातं. या गडावरील भवानीमातेच्या मंदिराला 360 वर्षे पूर्ण झाली आहेत.
सह्याद्री पर्वतरांगेत असलेला प्रतापगड किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे.
कोरोनाकाळात ही परंपरा खंडित होऊ नये यासाठी यावर्षीचा नवरात्रोत्सोव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येत आहे.
शिवाजी महाराजांनी नेपाळच्या गंडकी नदीतील शाळीग्राम दगडापासून येथील भवानी मातेची मूर्ती तयार करुन घेतली होती. या मूर्तीची स्थापना 1661मध्ये झाली असल्याची इतिहासात नोंद आहे.
यावर्षी मूर्तीच्या स्थापनेला 360 वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे 360 मशालींनी गड तेजोमय झाला होता. महत्वाचं म्हणजे दर वर्षी एका मशीलीची भर यात पडत असते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. सोबतच सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत मशाली पेटवण्यात आल्या आहेत. नवरात्रीच्या चतुर्थीला या मशाली पेटवण्याची परंपरा बरेच वर्ष सुरू आहे.