
अनेक वेळा तरुणाई आपल्या तारुण्यात अनेक वाईट सवयी अंगीकारतात. यामुळे ते आपल्या ध्येयापासून विचलित तर होतातच शिवाय मानसिक तणावाखालीही राहतात. चाणक्य नीतीनुसार तरुणपणात काय काळजी घ्यावी.

आत्मविश्वास - चाणक्य नीतीनुसार, जीवनात यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. या जगात जर तुम्ही कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवायला हवा तर तो 'स्वत:वर'. आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही आयुष्यात खूप काही मिळवू शकता. जर तुमच्याकडे बुद्धिमत्ता असेल पण आत्मविश्वास नसेल तर अशा ज्ञानाचा आयुष्यात काहीच फायदा होत नाही.

शिस्त - चाणक्य नीतीनुसार तरुणांमध्ये शिस्तीचे खूप महत्त्व आहे. जे तरुण आपल्या जीवनात शिस्तीचे पालन करतात ते जीवनात उंची गाठतात. त्यामुळे प्रत्येक काम वेळेत पूर्ण करणे ही एक चांगली सवय आहे. आयुष्यात आपण वेळेचे महत्त्व पाळले पाहीजे. जेव्हा आपण वेळेला किंमत देतो तेव्हा आपण यशाची एक पायरी चढलेलो असतो. वेळेचे महत्त्व जाणणाऱ्या लोकांना यश मिळेवणे ही गोष्ट कठीण नसते.

अंमली पदार्थांपासून दूर राहा - अनेक वेळा अनेक तरुण चुकीच्या सवयी लावतात. त्याचा त्यांच्या जीवनावर खूप वाईट परिणाम होतो. यामुळे पैशाचा अपव्यय तर होतोच शिवाय आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे अशा वाईट सवयींना कधीही लागू नका. अंमली पदार्थांपासून तुम्हाला क्षणीक आनंद मिळतो पण तुम्ही आयुष्यातील महत्त्वाची वेळ वाया घालवत असता हे लक्षात असू द्या.