चंद्रपुरात भीषण पाणीटंचाई, प्रतिष्ठित नागरिकांच्या घरातही पाण्याला घरघर

चंद्रपूर शहरात वाढत्या उन्हामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महानगरपालिका दररोज १८० टँकर पाणीपुरवठा करत असूनही, अनेक वॉर्डांना पुरेसे पाणी मिळत नाही. नागरिकांना पाण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे.

| Updated on: Apr 28, 2025 | 3:08 PM
1 / 8
वाढत्या तापमानामुळे चंद्रपूर शहरातील विविध भागांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवत आहे.

वाढत्या तापमानामुळे चंद्रपूर शहरातील विविध भागांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवत आहे.

2 / 8
चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे (मनपा) शहरातील अनेक वॉर्डांमध्ये दररोज तब्बल १८० टँकर फेऱ्या करून पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे, शहरातील काही प्रतिष्ठित नागरिकांच्या वॉर्डांमध्येही मनपाला टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे (मनपा) शहरातील अनेक वॉर्डांमध्ये दररोज तब्बल १८० टँकर फेऱ्या करून पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे, शहरातील काही प्रतिष्ठित नागरिकांच्या वॉर्डांमध्येही मनपाला टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.

3 / 8
मनपाच्या आठ आणि खाजगी चार अशा एकूण १२ टँकरच्या माध्यमातून शहरातील वडगाव, लक्ष्मीनगर, हवेली गार्डन परिसर, जगन्नाथ बाबा वार्ड, रमाईनगर, अष्टभूजा वार्ड, बाबूपेठ, नगिनाबाग, घुटकाळा, गुलमोहर, महाकाली कॉलरी, अंचलेश्वर गेट, राष्ट्रवादी नगर, विठ्ठल मंदिर वार्ड, जटपुरा गेट, कृष्ण नगर, इंदिरा नगर यांसारख्या अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे.

मनपाच्या आठ आणि खाजगी चार अशा एकूण १२ टँकरच्या माध्यमातून शहरातील वडगाव, लक्ष्मीनगर, हवेली गार्डन परिसर, जगन्नाथ बाबा वार्ड, रमाईनगर, अष्टभूजा वार्ड, बाबूपेठ, नगिनाबाग, घुटकाळा, गुलमोहर, महाकाली कॉलरी, अंचलेश्वर गेट, राष्ट्रवादी नगर, विठ्ठल मंदिर वार्ड, जटपुरा गेट, कृष्ण नगर, इंदिरा नगर यांसारख्या अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे.

4 / 8
या वॉर्डांमध्ये १८० टँकर फेऱ्यांद्वारे नागरिकांची तहान भागवली जात आहे. शहरात एकूण ९० ठिकाणी तात्पुरत्या पाणी टाक्या उभारून नागरिकांना पाणी पुरवले जात आहे.

या वॉर्डांमध्ये १८० टँकर फेऱ्यांद्वारे नागरिकांची तहान भागवली जात आहे. शहरात एकूण ९० ठिकाणी तात्पुरत्या पाणी टाक्या उभारून नागरिकांना पाणी पुरवले जात आहे.

5 / 8
चंद्रपूर शहरासोबतच ग्रामीण भागातही पाणी टंचाईची गंभीर परिस्थिती आहे. नगरपरिषदा आणि ग्रामपंचायतीमार्फत अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा केला जात असला तरी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सध्या किती गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे याची नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही, असे सांगण्यात आले आहे.

चंद्रपूर शहरासोबतच ग्रामीण भागातही पाणी टंचाईची गंभीर परिस्थिती आहे. नगरपरिषदा आणि ग्रामपंचायतीमार्फत अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा केला जात असला तरी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सध्या किती गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे याची नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही, असे सांगण्यात आले आहे.

6 / 8
चंद्रपूर शहरात भीषण पाणी टंचाई असतानाही प्रशासन मात्र ही बाब मान्य करण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

चंद्रपूर शहरात भीषण पाणी टंचाई असतानाही प्रशासन मात्र ही बाब मान्य करण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

7 / 8
कधी मनपाच्या टँकरची वाट पाहण्यात, तर कधी पैसे देऊन पाणी विकत घेण्यास ते मजबूर झाले आहेत. या गंभीर समस्येवर प्रशासनाकडे कोणतेही ठोस उत्तर नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

कधी मनपाच्या टँकरची वाट पाहण्यात, तर कधी पैसे देऊन पाणी विकत घेण्यास ते मजबूर झाले आहेत. या गंभीर समस्येवर प्रशासनाकडे कोणतेही ठोस उत्तर नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

8 / 8
आगामी काही दिवसात तापमान आणखी वाढण्याची शक्यता असल्याने पाणीटंचाईची समस्या अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आगामी काही दिवसात तापमान आणखी वाढण्याची शक्यता असल्याने पाणीटंचाईची समस्या अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.