
अभिनेत्री करिश्मा कपूर आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांचं लग्न होणार होतं. पण काही कारणांमुळे दोघांचं लग्न होवू शकलं नाही. दोघांनी अनेक वर्ष डेट देखील केलं. पण लग्नाची घोषणा झाल्यानंतर दोघांना विभक्त होण्याचा निर्णय घ्यावा लागला.

लग्नाआधी करिश्मा कपूर हिचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण कोणासोबत देखील अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही.. त्यानंतर करिश्मा हिने आईच्या इच्छेने श्रीमंत उद्योजक संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं.

संजय याच्यासोबत लग्न केल्यानंतर काही वर्षांत दोघांमध्ये वाद होवू लागले. दोघांनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले. अखेर २०१६ मध्ये संजय आणि करिश्मा यांचा घटस्फोट झाला.

मीडिया रिपोर्टनुसार, घटस्फोटानंतर अभिनेत्रीला पहिल्या पतीकडून १४ कोटी रुपये मिळाले. या बॉन्डच्या माध्यमातून करिश्मा हिला महिन्याला १० लाख रुपये व्याज मिळतो. घटस्फोटानंतर करिश्मा सिंगल मदर म्हणून दोन मुलांचा सांभाळ करत आहे.

करिश्मा हिने दोन मुलांसाठी दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. करिश्मा तिच्या दोन मुलांसोबत आनंदाने आयु्ष्य जगत आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.