
नागराज मंजुळे... मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक... सैराट सारखा सिनेमा नागराज यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिला. या सिनेमाने महाराष्ट्राला वेड लावलं. या सिनेमाची कथा, त्याचा आशय, गाणी सगळंच प्रेक्षकांच्या मनावर कोरलं गेलं.

नागराज यांच्या कविता त्यांचे सिनेमे समाज मनावर सकारात्मक ठसा उमटवतात. पण एखादी गोष्ट लिहिल्यानंतर ती कशी आहे? त्यात काय बदल केला पाहिजे. त्यावर सिनेमा होऊ शकतो का? या सगळ्याबाबत नागराज त्यांच्या जवळच्या काही माणसांशी चर्चा करतात.

नागराज त्यांच्या सहचारिणी गार्गी कुलकर्णी यांना त्यांची स्क्रिप्ट वाचायला देतात. अहमदनगरमध्ये शिकत असताना गार्गी आणि मी भेटलो. गार्गीला वाचनाची आवड आहे. ती खूप चांगल्या कविता लिहिते. फॅन्डीची पटकथा गार्गीनेच आधी वाचली होती, असं नागराज यांनी एका मुलाखतीत सांगितलं.

गार्गी मोजकं लिहिते. पण खूप दर्जेदार लिहिते. तिला साहित्याची उत्तम जाण आहे. आता आम्हीसोबत आहोत. गार्गीशिवाय कुतुब प्रियांका या माझ्या मित्रांनाही मी माझी स्क्रिप्ट वाचायला देतो. हे लोक माझं लेखन वाचून प्रतिक्रिया देतात. त्यांचं म्हणणं ऐकून मग मी पुढचा निर्णय घेतो, असं नागराज यांनी एका मुलाखतीत सांगितलं.

मी जे काही क्रिएटिव्ह करतो. त्यात गार्गीचा मोठा वाटा असतो. गार्गी म्हणजे माझा आरसा आहे, असं नागराज यांनी सांगितलं. फॅन्ड्री, सैराट, झुंड या सारखे सिनेमे नागराज यांनी केले आहेत. शिवाय नाळ आणि नुकताच आलेला नाळ 2 हे नागराज यांचे सिनेमेही प्रेक्षकांना आवडले.