
पती-पत्नीच नातं विश्वासाच्या पायावर उभं असतं. पण अनेकदा या नात्यात एक जण आपल्या पार्टनरला धोका देतो. त्यामुळे पती-पत्नीच मजबूत नातं संपुष्टात येऊ शकतं. अलीकडेच डेटिंग App ग्लीडने वैवाहित जोडप्यांबद्दल एक सर्वे केला. त्यातून किती टक्के भारतीय आपल्या जोडीदाराला धोका देतात. यात महिलांच प्रमाण किती टक्के आहे, त्याची माहिती समोर आली आहे.

या सर्वेनुसार जवळपास 55 टक्के भारतीयांनी आयुष्यात कमीत कमी एकदा आपल्या जोडीदाराला धोका दिला आहे. हे आकडे चक्रावून टाकणारे आहेत.

या सर्वेत म्हटलय की, एकाचवेळी दोन व्यक्तींवर प्रेम होऊ शकतं असं 48 टक्के भारतीय मानतात. 46 टक्के भारतीय मानतात की, एखादा व्यक्ती आपल्या जोडीदारावर प्रेम असतानाही धोका देऊ शकतो.

कदाचित हेच कारण असावं की, पार्टनरच्या अफेअरबद्दल समजल्यानंतरही त्याला माफ करण्यासाठी भारतीय तयार असतात असं सर्वेमध्ये म्हटलं आहे. 55 टक्के लोक पार्टनरला धोका देतात असं सर्वेत म्हटलं आहे. यात 56 टक्के महिला आहेत. या सर्वेमध्ये चेन्नई, हैदराबाद, पुणे, कोलकत्ता, अहमदाबाद, बंगळुरु, मुंबईतील 1525 विवाहित भारतीयांचा समावेश करण्यात आला होता.

2017 सालच्या सर्वेनुसार, भारतात एक हजार जोडप्यांपैकी 13 जोडपीच विभक्त होतात. 90 टक्के भारतीय अरेंज मॅरेज करतात. 5 टक्के लव्ह मॅरेज. 49 टक्के विवाहित लोकांनी पार्टनरशिवाय अन्य व्यक्तीसोबत रिलेशन असल्याच कबूल केलं होतं.