
गेले काही दिवस तळकोकणात पावसाने दडी मारली आहे. याचा परिणाम पर्यटन स्थळांवर झालेला दिसून येत आहे. एरव्ही पावसाळ्यात वीकेंडला पर्यटकांच्या गर्दीने फुलून जाणारा सावडाव धबधबा ही ओस पडला आहे.

आज विकेंड असून ही या धबधब्यावर तुरळक गर्दी होती. पाऊस नसल्याने धबधब्याच्या पाण्याला ही जोर नाही. त्यामुळे पर्यटक ही नाराज झालेले दिसून आले.

गेल्या आठ दिवसापासून पावसाची उघडझाप सुरू असल्याने व आज रविवारचा विकेंड असल्याने पर्यटकांची पावले वळली आहेत. पावसाचे माहेरघर आणि महाराष्ट्राचे नंदन वन समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्टकांची गर्दी होत असून भावली धबधबा पर्यटकांना आकर्षित करत आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या बिलगाव येथील बारामुखी धबधबा हा प्रवाहित झाला असून, पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. धडगाव तालुक्यातील उदय नदीवर असलेल्या या धबधबातून बारा ठिकाणहून पाणी प्रवाहित होत असते.

यामुळे हा धबधबा आकर्षक दिसत असून सातपुड्याचा सौंदर्याचा एक नमुनाच महाराष्ट्रासह जवळील गुजरात आणि मध्य प्रदेशातील अनेक पर्यटक या ठिकाणी धबधबा बघण्यासाठी येत असतात.