
IPL 2024 चा सीजन सुरु असताना रोहित शर्मा सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी चांगली होत नाहीय. आतापर्यंत या टीमने चार मॅच गमावल्या आहेत.

आयपीएलमध्ये रोहित शर्माची बॅट तळपतेय. पण टीम चांगलं प्रदर्शन करत नाहीय. मागच्याच चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने 12 वर्षानंतर शतक झळकावलं. पण त्याचा उपयोग झाला नाही. कारण मुंबई इंडियन्सच्या टीमचा पराभव झाला.

मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. टीमचा कॅप्टन हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मामध्ये मतभेद असल्याच्या बातम्या येत असतात. त्यामुळे रोहित शर्मा टीम जिंकली किंवा हरली, तरी चर्चेत असतो.

आयपीएल 2024 चा सीजन संपल्यानंतर लगेच 2 जूनपासून T20 वर्ल्ड कप होणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये हा वर्ल्ड कप होईल. या वर्ल्ड कपसाठी रोहित शर्माच टीम इंडियाचा कॅप्टन असणार आहे.

2022 चा T20 वर्ल्ड कप त्यानंतर मागच्यावर्षी झालेल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माच टीम इंडियाचा कॅप्टन होता. शेवटच्या T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच आवाहन सेमीफायनल तर वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पराभव झाला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पराभूत केलं.

आणखी दोन महिन्यांनी होणाऱ्या T20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर कॅप्टन रोहित शर्माने बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि टीमचे हेड कोच राहुल द्रविड यांची भेट घेतल्याची बातमी आली होती. त्यावर आता रोहित व्यक्त झाला आहे.

मायकल वॉन आणि एडम गिलख्रिस्ट यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना रोहित शर्माने हे वृत्त फेटाळून लावलं. भेट घेतल्याच वृत्त खोट असल्याच रोहित म्हणाला.

"मी कोणालाही भेटलेलो नाही, असं रोहितने स्पष्ट केलं. अजित आगरकर दुबईमध्ये गोल्फ खेळतायत. राहुल द्रविड बंगळुरुमध्ये त्यांच्या मुलांचा खेळ पाहत आहेत. प्रामाणिकपणे सांगतो, आम्ही भेटलेलो नाही" असं रोहित शर्मा म्हणाला.

बातमीचा सोर्स विश्वसनीय असला पाहिजे. कुठलीही खातरजमा न करता येणाऱ्या बातम्यांबद्दल रोहित शर्माने सावध राहण्याचा सल्ला दिला.

"सध्याच्या काळात तुम्ही माझ्याकडून किंवा राहुल द्रविड यांच्याकडून ऐकत नाही. अजित आगरकर किंवा बीसीसीआयकडून कोणी कॅमेऱ्यासमोर येऊन बोलत नाही, तो पर्यंत हे सगळं फेक, खोटं आहे" असं रोहित शर्मा म्हणाला.